शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

"भाजपने दिलेला ४०० पारचा नारा स्वत:ची समजूत काढणारा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 20:15 IST

प्रकाश आंबेडकारांची सडकून टीका : ‘महाएल्गार’ सभेपूर्वी पत्रपरिषदेतून केले आरोप .

वर्धा : भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागा पार करण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, हे सरकार दीडशे जागांचाही आकडा पार करु शकणार नाही, ४०० जागा जिंकण्याचा दावा हा नागरिकांची दिशाभूल करणारा असून केवळ स्वत:ची समजूत घालणाराच आहे. अशी टिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभेपूर्वी त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस हे दोघेही हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत. आज देशात बहुतांश जनता ही पूर्णत: हिंदूच आहे. मग त्यासाठी धार्मिक राजकारण करण्याची गरज काय, मागील दहा वर्षांत जे वक्तव्य आणि कारवाई झाली त्यातून वैदीक परंपरा विरुद्ध संत परंपरा याची पुनरावृत्ती आताही दिसून येत आहे. संतांनी सामाजिक विचारसरणीची मांडणी केली ती सामूहिक आणि व्यक्तीस्वातंत्र या मुद्द्याला आधारुन होती. संतांच्या विचारांनी आधारित जे संविधान आहे त्याविरोधातच भाजप आणि आरएसएस दिसून येत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. 

आज शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. सोनिया गांधींना राहुल गांधीला तर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील पंत्रप्रधान पदाचे स्वप्न पाहत आहे. भाजप सरकार पूर्णपणे घाबरले आहेत. म्हणूनच ते पक्ष फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत.  स्वताचे घर शाबुत ठेवण्यासाठी दुसऱ्यांचे घरं फोडण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परीषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे, डॉ. निशा शेंडे, सुभाष खंडारे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.   जरांगेंचे आंदोलन यशस्वी झाल्यास सत्तेत उलथापालथ  गेल्या अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहे. यासाठी त्यांनी आंदोलनही पुकारले होते. मात्र, त्यांना  तात्पुरता जीआर देऊन त्यांना आंदोलन मागे घेण्यास सरकारने प्रवृत्त केले. मात्र, पुन्हा जरांगेंनी उपोषण सुरु केले आहे. त्यांचे आंदोलन यशस्वी झाल्यास सत्तेत मोठी उलथापालथ होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.   इलेक्ट्राॅनिक उपकरण फुलप्रुफ आहे असे म्हणता येणार नाही २००४ च्या निवडणुकीत मी हरलो होतो. तेव्हा मी म्हटल होतं की मला इव्हीएमने पाडलं. कोणत्याही इलेक्ट्राॅनिक उपकरणाला डिकोडींग करण्यास आणि प्रीप्राेग्रामींग करण्यास वेळ लागत नाही. इव्हीएममध्ये फेरबदलही करता येतो. इव्हीएमच्या सुरक्षेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरनेच निवडणुका झाल्या पाहिजे. इलेक्ट्राॅनिक उपकरण हे फुलप्रुफ आहे, असे म्हणता येणार नाही.  हिंदूंना देशाचे नागरिकत्व सोडून जावे लागले ही शोकांतिकाच १९५० ते २०१३ पर्यंद देशाचं नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सात हजार २०० इतकी होती. मात्र, २०१३ पासून आतापर्यंत २४ लाख कुटुंब तेही हिंदू कुटुंब ज्यांची मालमत्ता ५० हजार कोटी असेल अशांना देश सोडायला लावलं. त्यांनीही नागरिकत्व सोडून परदेशात जात नागरिकत्व स्वीकारले. देशाचं नागरिकत्व सोडणारा वर्ग हा संत परंपरेला मानणारा होता. त्यांच्यासमोर अशी परिस्थिती केली की त्यांना नागरिकत्वच सोडावं लागल. हिंदूंच्या राज्यात हिंदूंना देशाचं नागरिकत्व सोडण्यास प्रवृत्त करणे, ही मोठी शाेकांतिका असल्याची टिका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर