शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपने दिलेला ४०० पारचा नारा स्वत:ची समजूत काढणारा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 20:15 IST

प्रकाश आंबेडकारांची सडकून टीका : ‘महाएल्गार’ सभेपूर्वी पत्रपरिषदेतून केले आरोप .

वर्धा : भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागा पार करण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, हे सरकार दीडशे जागांचाही आकडा पार करु शकणार नाही, ४०० जागा जिंकण्याचा दावा हा नागरिकांची दिशाभूल करणारा असून केवळ स्वत:ची समजूत घालणाराच आहे. अशी टिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभेपूर्वी त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस हे दोघेही हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत. आज देशात बहुतांश जनता ही पूर्णत: हिंदूच आहे. मग त्यासाठी धार्मिक राजकारण करण्याची गरज काय, मागील दहा वर्षांत जे वक्तव्य आणि कारवाई झाली त्यातून वैदीक परंपरा विरुद्ध संत परंपरा याची पुनरावृत्ती आताही दिसून येत आहे. संतांनी सामाजिक विचारसरणीची मांडणी केली ती सामूहिक आणि व्यक्तीस्वातंत्र या मुद्द्याला आधारुन होती. संतांच्या विचारांनी आधारित जे संविधान आहे त्याविरोधातच भाजप आणि आरएसएस दिसून येत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. 

आज शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. सोनिया गांधींना राहुल गांधीला तर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील पंत्रप्रधान पदाचे स्वप्न पाहत आहे. भाजप सरकार पूर्णपणे घाबरले आहेत. म्हणूनच ते पक्ष फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत.  स्वताचे घर शाबुत ठेवण्यासाठी दुसऱ्यांचे घरं फोडण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परीषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे, डॉ. निशा शेंडे, सुभाष खंडारे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.   जरांगेंचे आंदोलन यशस्वी झाल्यास सत्तेत उलथापालथ  गेल्या अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहे. यासाठी त्यांनी आंदोलनही पुकारले होते. मात्र, त्यांना  तात्पुरता जीआर देऊन त्यांना आंदोलन मागे घेण्यास सरकारने प्रवृत्त केले. मात्र, पुन्हा जरांगेंनी उपोषण सुरु केले आहे. त्यांचे आंदोलन यशस्वी झाल्यास सत्तेत मोठी उलथापालथ होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.   इलेक्ट्राॅनिक उपकरण फुलप्रुफ आहे असे म्हणता येणार नाही २००४ च्या निवडणुकीत मी हरलो होतो. तेव्हा मी म्हटल होतं की मला इव्हीएमने पाडलं. कोणत्याही इलेक्ट्राॅनिक उपकरणाला डिकोडींग करण्यास आणि प्रीप्राेग्रामींग करण्यास वेळ लागत नाही. इव्हीएममध्ये फेरबदलही करता येतो. इव्हीएमच्या सुरक्षेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरनेच निवडणुका झाल्या पाहिजे. इलेक्ट्राॅनिक उपकरण हे फुलप्रुफ आहे, असे म्हणता येणार नाही.  हिंदूंना देशाचे नागरिकत्व सोडून जावे लागले ही शोकांतिकाच १९५० ते २०१३ पर्यंद देशाचं नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सात हजार २०० इतकी होती. मात्र, २०१३ पासून आतापर्यंत २४ लाख कुटुंब तेही हिंदू कुटुंब ज्यांची मालमत्ता ५० हजार कोटी असेल अशांना देश सोडायला लावलं. त्यांनीही नागरिकत्व सोडून परदेशात जात नागरिकत्व स्वीकारले. देशाचं नागरिकत्व सोडणारा वर्ग हा संत परंपरेला मानणारा होता. त्यांच्यासमोर अशी परिस्थिती केली की त्यांना नागरिकत्वच सोडावं लागल. हिंदूंच्या राज्यात हिंदूंना देशाचं नागरिकत्व सोडण्यास प्रवृत्त करणे, ही मोठी शाेकांतिका असल्याची टिका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर