शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अंदोरीत २२ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 9:02 PM

तालुक्यात अंदोरी येथे शिळे अन्न खाण्यात आल्याने २२ जणांना विषबाधा झाली आहे. यात एकाच परिवारातील ११ जणांचा समावेश आहे. सर्वांना एकाचवेळी थंडी वाजून ताप आल्यानंतर उटली व हगवणीचा त्रास सुरु झाल्याने गावात धावपळ माजली.

ठळक मुद्देशिळे अन्न खाल्ल्याने उलटी व हगवण : एकाच कुटुंबातील ११ जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यात अंदोरी येथे शिळे अन्न खाण्यात आल्याने २२ जणांना विषबाधा झाली आहे. यात एकाच परिवारातील ११ जणांचा समावेश आहे. सर्वांना एकाचवेळी थंडी वाजून ताप आल्यानंतर उटली व हगवणीचा त्रास सुरु झाल्याने गावात धावपळ माजली. सर्वांना उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरुअसल्याचे सांगण्यात आले आहे.अंदोरीच्या इंदिरा वसाहतीतील देवराव पोहणकर यांच्याकडे महालक्ष्मी पुजनानिमित्त रविवारला जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. या कार्यक्रमातील शिल्लक राहिलेल्या अन्नाचा दुसऱ्या दिवशी सोमवारी पोहणकर परिवारासह इतरांनीही आस्वाद घेतला. ज्यांनी हे शिळे अन्न खाल्ले त्या सर्वांनाच मंगळवारच्या पहाटे थंडी वाजुन ताप आला. तसेच उलट्या व हगवणीचाही त्रास सुरु झाला.पोहणकर कुटुंबियांतील एका पाठोपाठ अकरा जणांमध्ये ही लक्षणे दिसून येऊ लागली. तसेच इतर परिवारातील सदस्यांनाही हा त्रास सुरु झाल्याने प्रारंभी खासगी डॉक्टरला बोलावून उपचार करण्यात आले. त्यानंतरही आराम होत नसल्याने सर्वांना आरोग्य उपकेंद्रात दाखल करुन सलाईन लावण्यात आली. पण, परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने सर्वांना बुधवारच्या मध्यरात्री सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु केले. सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.बाधितांमध्ये यांचा समावेशविषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये पोहणकर परिवारातील देवराव पोहणकर, हनुमंत पोहणकर, साक्षी पोहणकर, मोनाली पोहणकर, आदित्य पोहणकर, सचिन पोहणकर, कल्पना पोहणकर, दीपा पोहणकर, छबु पोहणकर, देविदास पोहणकर, कौसल्य पोहणकर तसेच गायत्री निरघुडे, अर्चना खोकले, ऋषिकेश खोकले, नंदा भोयर, गुलाब ढगे, कुसुम ढगे, रुबीना आगवान, साहीन आगवान, वर्षा चौधरी, हनुमंत चौधरी, कविता चौधरी यांचा समावेश आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुख्यालयाला दांडी; सुविधांचा अभावअंदोरी येथील आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. श्वेता थूल व दोन परिचारीका कार्यरत आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी थूल व एक परिचारीका वर्धेवरुन ये-जा करतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांची उपकेंद्रात हजेरी राहत नाही. एका शिकाऊ परिचारीकेच्या भरवश्यावरच रात्री उपकेंद्राचे कामकाज चालते.परिणामी रात्रीच्यावेळी आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास रुग्णांना सेवाग्राम किंवा सावंगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते.त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी गावकºयांकडून करण्यात आली आहे.आरोग्य विभागाची उडाली धावपळअंदोरीत गावात विषबाधा झाल्याची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण धमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय चमू गावात दाखल झाली. एकाच वेळी २२ जणांना विषबाधा झाल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली. त्यांनी अन्नाचे व पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. तसेच रुग्णांवर उपचारही सुरु केले असून इतरही रुग्णांचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर