नाफेडच्या तूर खरेदीचे चुकारे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:02+5:30
नियमाचे पालन करीत तुरीची शासकीय खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र महिन्याभरापासून चुकारे रखडलेले आहे. शासनाने हमीभाव तूर खरेदीकेंद्र सुरू झाल्याची माहिती शेतकऱ्यांना मोबाईल मॅसेजद्वारे दिली आहे. मॅसेज पाठवून बोलविलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात आहे. दररोज जवळपास १०० क्विंटल तूर खरेदी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन होताना दिसत आहे.

नाफेडच्या तूर खरेदीचे चुकारे रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहाणार असल्याने २० एप्रिलपासून ग्रीन झोनच्या जिल्ह्यात शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहे.
नियमाचे पालन करीत तुरीची शासकीय खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र महिन्याभरापासून चुकारे रखडलेले आहे. शासनाने हमीभाव तूर खरेदीकेंद्र सुरू झाल्याची माहिती शेतकऱ्यांना मोबाईल मॅसेजद्वारे दिली आहे. मॅसेज पाठवून बोलविलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात आहे. दररोज जवळपास १०० क्विंटल तूर खरेदी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन होताना दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी खरेदीच्या ठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. कुठेही गर्दी होवू नये म्हणून खरेदी-विक्री संघाचे कर्मचारी अशोक रनणवरे व ग्रेडर सोनू मेश्राम प्रयत्नशील आहेत. मागील दीड महिन्यापासून खरेदी सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांना अजूनपर्यंत एकही चुकारा मिळालेला नाही. शेतकरी चुकारा कधी मिळणार यासाठी खरेदीच्या ठिकाणी विचारणा करण्याकरिता येत आहे. चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना येरझारा घालाव्या लागत आहे.
नोंदणी केलेल्यांना फटका
सेलू येथेही नाफेडची तूर खरेदी सुरू करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांना एसएमएस पाठवून तूर आणण्यास सांगण्यात आले. नोंदणीच्यावेळी शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या नोंदीत खरेदीच्यावेळी स्थानिक कर्मचाऱ्यांनी तफावत निर्माण केल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहे. एका शेतकऱ्याकडून पाच क्विंटलच्या वर तूर घेतली जात नाही. सातबारावरच्या नोंदीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकºयांना व्यापाºयांना माल द्यावा लागत आहे.