शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शेतकरी, शेती व महिलांच्या समस्यांकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:31 IST

माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खा. शरद पवार हे विदर्भ दौºयानिमित्त वर्धा येथे आले होते. याप्रसंगी विदर्भातील शेतकरी, शेती आणि महिलांच्या विविध समस्यांबाबत सामाजिक जाण म्हणून विशेष लक्ष ....

ठळक मुद्देजिजाऊ ब्रिगेडची मागणी : शरद पवार यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खा. शरद पवार हे विदर्भ दौºयानिमित्त वर्धा येथे आले होते. याप्रसंगी विदर्भातील शेतकरी, शेती आणि महिलांच्या विविध समस्यांबाबत सामाजिक जाण म्हणून विशेष लक्ष देण्याची मागणी स्थानिक विश्रामगृह येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. याबाबत त्यांना निवेदन सादर करण्यात आले.शरद पवार यांची राजकीय प्रवास व सामाजिक अभ्यास तसेच कृषी क्षेत्रात प्रचंड जाण असणारा नेता म्हणून ख्याती आहे. विदर्भातील शेतकरी व त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणारे प्रामाणिक नेतृत्व विदर्भात निर्माण होऊ न शकल्याने जल, जंगल, जमीन, जनावरे, खनिज, वीज अशा अनेकविध संसाधनांनी परिपूर्ण असलेला विदर्भ शेतकरी आत्महत्या व समस्याग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथील जनसामान्य आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाज हा कंगाल झाला आहे. सिंचनाच्या पूरेशा सोयी नसतानाही शेतकरी कष्ट करून पिके घेतो; पण योग्य भाव मिळत नाही. शेतमाल साठवून ठेवण्याची पूरेशी सोय नाही. ऊस व कांदा शेतमाल उत्पादकांकरिता जशी आंदोलने होतात, त्या पद्धतीने विदर्भातील कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, धान या पिकांकरिता भाव मिळावा म्हणून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. सिंचनाच्या पूरेशा सोयींचा अभाव, अपूरा वीज पुरवठा, शिक्षणाचे बाजारीकरण, शेतमालाला मिळत नसलेला योग्य भाव, बाजारपेठेचा अभाव यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे. शेतकरी तसेच महिलांकरिता सक्षम बचत गट निर्माण करणे, महिलांवर होणारे अत्याचार, प्रशासनाची दिरंगाई, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या किमतीत सातत्याने होत असलेली वाढ यामुळे विदर्भातील समस्यांकडे विशेष लक्ष देण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडतर्फे करण्यात आली.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष योगीता इंगळे, जिजाऊ ब्रिगेडच्या वंदना गावंडे, शुभांगी विधळे, वैशाली गिºहे, शारदा डुकरे, मंगला तिगावकर, अश्विनी काकडे, अनीता येवले, अलका भुगूल, किरण बिपल्लीवार, पुष्पा मोहोड, योगीता भुजाडे, संगीता जुमडे, गीता हिवरे, रोहिणी बाबर, निलिमा बोनगिरवार, वर्षा म्हैसकर, प्रतीभा वाळके, सोनाली रोकडे, अश्विनी ठाकरे, कविता नखाते, सुचिता ठाकरे, मेघा सहारे, मीनाक्षी विंचूरकर, सीमा ढोबळे आदी उपस्थित होते.कापसाचे राजकारण थांबविणे गरजेचेविदर्भातील कापसासाठी आंदोलने केली जात नाहीत; उलट आंदोलनांचा देखावा करून राजकारण केले जात आहे. ही बाब आजची नसून कित्येक वर्षांपासून हे होत आहे. परिणामी, कापसाला आजही योग्य हमीभाव मिळत नाही. यामुळे वरिष्ठ नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून विदर्भातील शेतीला न्याय मिळवून देत राजकारण थांबविणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी