शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

विलगीकरणासाठी प्रवाशांची तब्बल चार तास ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:00 AM

जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. विमान, रेल्वे किंवा बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश आहे. बाहेर जिल्ह्यातून वर्धा शहरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरी जाण्यापूर्वी सामान्य रुग्णालयात तपासणी करुन नंतरच क्वारंटाईन व्हावे लागतात.

ठळक मुद्देसामान्य रुग्णालयातील प्रकार : मुंबई, पुण्यातून आलेल्या सात व्यक्तींचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याबाहेरुन शहरात आलेल्यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य तपासणी करणे बंधनकारक केले आहे पण; सामान्य रुग्णालयात तपासणीकरिता नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची नेहमीच ओरड होत आली आहे. आजही मुंबई व पुण्यावरुन आलेल्यांना तब्बल चार तास ताटकळत राहावे लागले. त्यामुळे त्यांनी सामान्य रुग्णायालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. विमान, रेल्वे किंवा बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश आहे. बाहेर जिल्ह्यातून वर्धा शहरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरी जाण्यापूर्वी सामान्य रुग्णालयात तपासणी करुन नंतरच क्वारंटाईन व्हावे लागतात. रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांना थेट रुग्णालयात पोहोचविण्यासाठी तेथे प्रशासनाकडून वाहनाची व्यवस्था केली आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका परिवारातील पाच व्यक्ती मुंबई आणि दोघे पुण्याहून आले.या सातही जणांना सामान्य रुग्णालयात तपासणीकरिता नेले. रात्रभर प्रवास करुन आलेले हे सर्व व्यक्ती आरोग्य तपासणीकरिता उपाश्यापोटी बसून राहिले.रुग्णालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना वारंवार तपासणी करण्याची विनंती केल्यानंतरही त्यांना तब्बल दीड वाजतापर्यंत बसवून ठेवले. त्यानंतर यातील एकाने उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली. त्यानंतर लगेच यासर्वांची विचारपूस करुन त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारुन त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्राकडे रवाना केले. सामान्य रुग्णालयातील त्यांना आलेल्या या अनुभवामुळे त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.जिल्हा सामान्य रुग्णालयात असा प्रकार होऊच शकत नाही. बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांच्या तपासणीकरिता चोविस तास व्यवस्था करण्यात आली आहे. आजही सकाळी साडेदहा वाजतापासून त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित होते. आलेल्यांची तपासणी करुन त्यांना लगेच गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविले जातात. कधीकधी वाहन उपलब्ध नसले तर थोडा विलंब होऊ शकतो.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल