शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

राष्ट्रवादीतील दुफळीनंतर साहेब-दादांशी स्नेह कायम राखण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:43 IST

राकाँतील बंडानंतर नेत्यांसमोर प्रश्न : साहेबांकडे समर्थकांची गर्दी

वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून व त्यापूर्वीही शरद पवार, अजित पवार यांच्याशी स्नेहबंध सांभाळून ठेवणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांची राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोची झाली आहे. विदर्भात दादा व साहेब यांचे संबंध सांभाळून कुण्या एकाकडे आपली राजकीय शक्ती ठेवताना नेत्यांची धडपड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर सामान्य कार्यकर्ते या घटनेने हादरले आहेत. ज्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून काम केले त्यांचा स्नेहसंबध साहेब व दादा या दोघांशीही आहे. आता फुटीनंतर दोन्ही गट या नेत्यांशी संपर्क करत आहे. मात्र, राजकीय भूमिका काहीतरी घ्यावी लागणार असल्याने काहींंनी साहेबांना पसंती दिली आहे, तर काही दादांकडे गेले आहेत. या साऱ्या प्रकारात आपले वैयक्तिक संबंध दोघांशीही अबाधित राहिले पाहिजे म्हणून दादा-साहेबांना भेटून आपली होत असलेली गोची सांगण्याचे काम काही नेतेमंडळी करीत आहेत.

काँग्रेस पक्षातून बाहेर पडून १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. विदर्भात काँग्रेसची ताकत मोठी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस येथे फार पाळेमुळे मजबूत करू शकली नाही. मात्र. प्रत्येक जिल्ह्यातील संस्थानिक नेते या पक्षात दाखल झाले. विशेषत: सहकारामध्ये काम करणाऱ्या नेत्यांचा समावेश यात होता. आता पक्षाचे विभाजन झाल्याने कुणाकडे जावे, हा प्रश्न पडला आहे. दोघांकडूनही संपर्क केला जात आहे. अशावेळी नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत निश्चित तयारी नेतेमंडळी करीत आहे.

वर्धाचे ज्येष्ठ सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांनी शरदचंद्र पवार यांच्याकडेच राहण्याचा निर्णय घेतला. साहेबांशी गेल्या पंधरा वर्षांपासून संबंध आहेत., ते तोडणे शक्य नाही. त्यामुळे आपण दादांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचविणाऱ्यांना तशी माहिती दिली असल्याचे ’लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले. तर दोघांशीही आपले स्नेहसंबंध कायम ठेवून काही मुद्द्यांच्या आधारे (जसे की ओबीसींचे प्रश्न, ओबीसी विद्यार्थ्यांच्या अडचणी) आदींसाठी छगन भुजबळ काम करीत असल्याने आपण अजित पवारांकडे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, मोठ्या पवारांशीही आदराचे संबंध आजही कायम राहतील, असे महात्मा फुले समता परिषदेचे नेते प्रा. दिवाकर गमे यांनी सांगितले.

विदर्भात साहेबांचे पारडे जड

विदर्भात पश्चिम व पूर्व असे दोन भाग असले तरी भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांतही साहेबांचे अनेक हितचिंतक आहेत. ते आता संकटाच्या काळात साहेबांसोबत येत आहेत. तसेच पश्चिम विदर्भातही साहेबांना मानणारा मोठा वर्ग राजकीय व इतर असल्याने या परिस्थितीत तोही वर्ग साहेबांसोबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दादांपेक्षा साहेबांचे पारडे विदर्भात भारी राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसwardha-acवर्धा