शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या आदर्शनगरात पाणीबाणी! चार दिवसांआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 3:25 PM

Wardha news वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मागील अनेक वर्षांपासून आदर्शनगर येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असून, अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही.

ठळक मुद्दे पाण्यासाठी दारोदार भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क 

सेवाग्राम : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मागील अनेक वर्षांपासून आदर्शनगर येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असून, अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या या परिसरात पाणीबाणी सुरू असून, रहिवाशांना चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने अनेकांना दुचाकी, चारचाकी, सायकलवरून पाणी भरण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. आदर्श नगरात नव्या घरांची भर पडत असल्याने घरांची संख्याही ६०० वर गेली आहे.

या परिसराची लोकसंख्या १८०० वर आहे. रहिवाशांना ग्रा.पं.च्या विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी जलकुंभ असून, त्यात पाणी साठवून ठेवले जाते. पाणी समस्या लक्षात घेता चार पाॅइंटवरून पाणी सोडण्यात येते. यात एका पाॅइंटसाठी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे चार दिवसांनंतरच पाणी मिळते. परिसरात तीन हँडपंप असून, त्या ठिकाणी सकाळी व सायंकाळी पाणी भरण्यासाठी रांगा लागतात‌. विशेष म्हणजे जुन्या कार्यकारिणीने जुन्या वस्तीतील विहिरीवरून पाइपलाइन टाकून आदर्शनगराच्या विहिरीत पाणी सोडण्याचा प्रयोग केला होता; पण तो प्रयोगही फोल ठरला. मात्र, आता पुन्हा ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

परिसरात पाणी समस्या आहे. ताकसांडे लेआऊटमधील विहिरीवरून पाणी घेण्यात येणार असल्याने समस्येवर काही प्रमाणावर तोडगा निघेल. ग्रा.पं.कडून प्रयत्न सुरू आहेत.

सुजाता ताकसांडे, सरपंच सेवाग्राम, ग्रा.पं.

ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी समस्या सुटत नाही. दरवर्षीची समस्या असल्याने तोडगा का काढला जात नाही, हे मात्र कळत नाही. भर उन्हाळ्यात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रोशन तेलंग, सामाजिक कार्यकर्ता.

पाण्याची बिकट समस्या आहे. म्हाडा कॉलनीतील हँडपंपवरून पाणी आणतो. मागील वर्षी वरूड रे. परिसरातील व्हाॅल्व्हवरून पाणी भरले. ग्रा.पं.ने तात्काळ उपाययोजना करून दिलासा द्यावा.

दिलीप शेंद्रे, नागरिक. आदर्शनगर.

टॅग्स :water shortageपाणीकपात