शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

विदर्भातील एकमेव बायोगॅस प्रकल्प टाकरखेडला

By admin | Updated: May 8, 2014 02:12 IST

श्री संत लहानुजी महाराज संस्थानद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बायोगॅस प्रकल्प निर्माण केला. आज या प्रकल्पामुळे इंधनाच्या बचतीसह झाडांची कत्तल थांबली

धूपबत्ती, गांडूळ खत निर्मितीविद्युतचीही होते निर्मिती : लहानुजी महाराज संस्थानचा उपक्रमसंजय देशमुख■ टाकरखेडश्री संत लहानुजी महाराज संस्थानद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बायोगॅस प्रकल्प निर्माण केला. आज या प्रकल्पामुळे इंधनाच्या बचतीसह झाडांची कत्तल थांबली व स्वयंपाक शिजविण्याचा प्रश्न मिटला. सोबतच विद्युत भारनियमनावर मात करण्यासाठी वीज निर्मितीही करण्यात आली. हा प्रकल्प विदर्भातील एकमेव बायोगॅस प्रकल्प म्हणून उदयास आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.या संस्थानमध्ये ११ हजार अन्नदाते आणि दररोज ५00 ते ६00 भाविक महाप्रसादाचा घेतात. यामुळे प्रत्येक महिन्यात तीन टन इंधन लागत होते. पर्यायाने ३ टन झाडांची कत्तल होत होती. यासाठी १८ हजार रुपये खर्च करावे लागत होते. संस्थानकडे गोरक्षण असून २५0 जनावरे आहेत. सरासरी ५ किलो आणि दररोज १२00 किलो शेण मिळते. याचा विचार करून गोबरगॅस संकल्पना राबविली जाऊ शकते, ही बाब संस्थानच्या संचालकांना लक्षात आली. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अहमदनगरचे जि.प. उपकार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांच्या मार्गदर्शनात १0५ घनमीटरचा एक प्लॉट न करता भविष्यात उपलब्ध होणारे कमी-अधिक शेण याचा विचार करून ३५ घनमीटरचे तीन प्लांट तयार करण्यात आले. शेण व पाण्याचे मिश्रण करण्यासाठी यंत्राचा उपयोग केला आहे. निर्माण झालेली गॅस शुद्ध करून एका बलूनमध्ये भरली जाते. ही गॅस स्वयंपाकगृहात पाठवून त्यापासून दररोज ६00 लोकांचा स्वयंपाक होतो. यात वर्षाला २ लाख १६ हजार रुपयांची बचत होत असून झाडाची कटाई थांबली.गॅसवर चालणारे जनरेटर बसवून १५ किलो वॅट विद्युत निर्माण करण्यात येते. यावर दररोज पाण्यासाठी लागणारा ५ हार्सपावरचा पंप दोन तास चालविला जातो. भारनियमन काळात संस्थानला लागणारी पूर्ण वीज यातून मिळते. अपारंपारिक स्त्रोत निर्माण करून आर्थिक बचतीसह पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य संस्थानने यशस्वी केले. शिवाय लग्नप्रसंगी वाया जाणारे अन्न व भाज्यांचे अवशेषही यात वापरले जातात. प्रकल्पातून निघणार्‍या परिपूर्ण खतापासून विविध वस्तूही तयार केल्या जातात. हा उपक्रम पाहून भारतातील पहिल्या हरितक्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांनी संस्थानला भेट दिली. संस्थानमध्ये त्यांच्या संस्थेची भारतातील पहिली शेतकरी प्रशिक्षण शाळा चालू करण्यात आली. यात शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकासह शेतीबाबत तज्ज्ञांद्वारे विनामूल्य मार्गदर्शन केले आहे.

■ या प्रकल्पातून निघणार्‍या परिपूर्ण खतापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. यात गांडूळ खत, गांडूळ पाणी, धूपबत्ती, मच्छर अगरबत्ती यांचा समावेश आहे. या खताचा उपयोग संस्थानच्या शेतीत करून १00 टक्के रसायनमुक्त करण्याचा मानस आहे.