शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

‘धाम’ मध्ये केवळ ८.३८ दलघमी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:17 PM

पूर्वी स्थानिक नगरपरिषेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जलाशयांमधील उपलब्ध पाण्याचे संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले.

ठळक मुद्देजलसंकट गडद : साडेतीन महिने पाणी वापरावे लागेल काटकसरीनेच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी स्थानिक नगरपरिषेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जलाशयांमधील उपलब्ध पाण्याचे संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, जसजसे दिवस लोटत गेले तसतसी जलाशयांमधील पाणी साठ्यात घट झाल्याने सध्या सहा दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात आहे. सध्यास्थितीत वर्धेकरांची तृष्णातृप्ती करणाऱ्या धाम प्रकल्पात केवळ ८.३८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असल्याने नागरिकांनाही पुढील साडेतीन महिने पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून जीवन प्राधिकरण वर्धा शहराच्या शेजारील ग्रामीण भागात तर नगर पालिका प्रशासन शहरी भागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करते. त्यामुळे धाम प्रकल्प हा वर्धा शहरासह शहराशेजारी असलेल्या सुमारे १५ गावांसाठी आधार देणाराच आहे. परंतु, मागील दोन वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने हा प्रकल्प पूर्णत: भरला नाही. त्यामुळे यंदा कमालीच्या जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून पाटबंधारे विभागाकडून महिन्यातून केवळ एक वेळाच सदर जलाशयातील पाणी सोडले जात आहे. शिवाय पाण्याची उचल करणाऱ्या संस्थांना सदर विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी याचा सर्वाधिक त्रास नागरिकांना व गृहिणींना सहन करावा लागत आहे.मागील वर्षी होते २४.६५ दलघमी पाणीदिवसेंदिवस वाढत असलेली वर्धा शहर व शहराशेजारील लोकसंख्या तसेच त्यांची वाढणारी पाण्याची मागणी यामुळे भविष्यात उद्भवणारी जल समस्या लक्षात घेऊन धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याचे वर्धा पाठबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने कागदोपत्री प्रक्रियाही सध्या केली जात आहे. परंतु, बड्या लोकप्रतिनिधींची उदासिनता व त्रुट्या शोधण्यात धन्यता मानत असलेल्या अधिकाऱ्यांमुळेच धाम प्रकल्पाची उंची मागील काही वर्षांपासून केवळ कागदावरच वाढत आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यात धाम प्रकल्पात २४.६५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. परंतु, यंदा तो केवळ ८.३८ दलघमी असल्याने पाण्याचा काटकसरीनेच वापर गरजेचा आहे.रामनगरात होतोयपाण्याचा अपव्ययरामनगर परिसरातील पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या महावीर बगीचात जलकुंभ आहे. परंतु, त्यापैकी एक जलकुंभातून सतत पाण्याची गळती होत आहे. सदर जलकुंभाची वेळीच दुरूस्ती होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याने दररोज येथे शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.न.प.कडून टँकर अधिग्रहित करण्यासाठी प्रयत्न सुरूसदर जलसंकटावर मात करण्यासाठी वर्धा न.प.ने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. सध्या पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करता यावा या अनुषंगाने काही खासगी टँकर अधिग्रहित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिवाय सदर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी व्हावी यासाठीही अधिकाºयांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी