शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नऊ वर्षांपासून मिळतेय एकच वेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:32 IST

एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देपावणेदोन कोटींच्या नळयोजनेनंतरही परिस्थिती गंभीर

विजय माहूरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसांतून एक वेळा पाणी पुरवठा करणे हे मागील नऊ वर्षांपासून सूरू आहे.तालुक्यात प्रथम नळयोजना घोराड गावात तत्कालीन सरपंच शंकरराव खोपडे यांनी आणली. या नळयोजनेचे काम १९७४ साली पूर्ण झाले. शिवाय तत्कालीन पालकमंत्री प्रभा राव यांच्या उपस्थितीत १९७५ ला या नळ योजनेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी दोन सार्वजनिक विहिरीवरून उचल केलेले पाणी एका जलकुंभात साठविले जात होते. शिवाय याच पाण्याचा पुरवठा गावातील दिवसातून दोन वेळा केल्या जात होता. तब्बल ३५ वर्षानंतर गावाला पाणी पुरवठा करण्यास जात असलेली अडचण पाहता नवीन नळयोजनेच्या प्रस्तावाला शासनाकडून हिरवा झेंडी मिळाला. २०१६-१७ या वर्षात पावणे दोन कोटींची नळ योजना कार्यान्वित होवून नवसंजीवनी मिळाली. नव्याने पाईप लाईन, दोन नवीन जलकुंभ आणि एका विहिरीची यात भर पडली.तसेच नळावर मिटर लाऊन २४ तास पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाली; पण जुनीच परिस्थिती कायम राहिली. पावणे दोन कोटी खुर्चनही घोरडवासियांना दिवसातून एकदाच पाणी देण्याचे धोरण कायम असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणी साठवणूक कशी करावी हा प्रश्न भेडसावत आहे.४० वर्षे जुन्या जलकुंभाचा आधारसहा हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन नळयोजना कार्यान्वित झाली. यात दोन नव्याने जलकुंभ बांधण्यात आले. मात्र, नवीन नळयोजना मंजूर करताना ४० वर्ष जुन्या जलकुंभ जिर्ण झाल्याची बाब समोर करण्यात आली होती. जि.प. पाणी पुरवठा विभाग आजही जिर्ण जलकुंभातून पाणी पुरवठा करण्यास मंजूरी देत आहे. याचा अर्थ जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाला आराखडा तयार करताना तीन जलकुंभाची आखणी का केली नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे.गावात २४ हातपंपासह पाणी पुरवठ्याच्या सात विहिरीघोराडमध्ये २४ हातपंप, पाणी पुरवठा करू शकणाऱ्या ७ विहिरी आहेत. जवळपास ११५० नळ जोडणी आहे. या सर्व विहिरी नळ योजनेला जोडल्यास ग्रामस्थांना दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा करणे सहज शक्यत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई