शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

नऊ वर्षांपासून मिळतेय एकच वेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:32 IST

एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देपावणेदोन कोटींच्या नळयोजनेनंतरही परिस्थिती गंभीर

विजय माहूरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : एकेकाळी सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी घोराडच्या नळयोजनेला पावनेदोन कोटींची नवीन नळयोजना तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. परंतु, आजही घोराडकरांना दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसांतून एक वेळा पाणी पुरवठा करणे हे मागील नऊ वर्षांपासून सूरू आहे.तालुक्यात प्रथम नळयोजना घोराड गावात तत्कालीन सरपंच शंकरराव खोपडे यांनी आणली. या नळयोजनेचे काम १९७४ साली पूर्ण झाले. शिवाय तत्कालीन पालकमंत्री प्रभा राव यांच्या उपस्थितीत १९७५ ला या नळ योजनेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी दोन सार्वजनिक विहिरीवरून उचल केलेले पाणी एका जलकुंभात साठविले जात होते. शिवाय याच पाण्याचा पुरवठा गावातील दिवसातून दोन वेळा केल्या जात होता. तब्बल ३५ वर्षानंतर गावाला पाणी पुरवठा करण्यास जात असलेली अडचण पाहता नवीन नळयोजनेच्या प्रस्तावाला शासनाकडून हिरवा झेंडी मिळाला. २०१६-१७ या वर्षात पावणे दोन कोटींची नळ योजना कार्यान्वित होवून नवसंजीवनी मिळाली. नव्याने पाईप लाईन, दोन नवीन जलकुंभ आणि एका विहिरीची यात भर पडली.तसेच नळावर मिटर लाऊन २४ तास पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाली; पण जुनीच परिस्थिती कायम राहिली. पावणे दोन कोटी खुर्चनही घोरडवासियांना दिवसातून एकदाच पाणी देण्याचे धोरण कायम असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणी साठवणूक कशी करावी हा प्रश्न भेडसावत आहे.४० वर्षे जुन्या जलकुंभाचा आधारसहा हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन नळयोजना कार्यान्वित झाली. यात दोन नव्याने जलकुंभ बांधण्यात आले. मात्र, नवीन नळयोजना मंजूर करताना ४० वर्ष जुन्या जलकुंभ जिर्ण झाल्याची बाब समोर करण्यात आली होती. जि.प. पाणी पुरवठा विभाग आजही जिर्ण जलकुंभातून पाणी पुरवठा करण्यास मंजूरी देत आहे. याचा अर्थ जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाला आराखडा तयार करताना तीन जलकुंभाची आखणी का केली नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे.गावात २४ हातपंपासह पाणी पुरवठ्याच्या सात विहिरीघोराडमध्ये २४ हातपंप, पाणी पुरवठा करू शकणाऱ्या ७ विहिरी आहेत. जवळपास ११५० नळ जोडणी आहे. या सर्व विहिरी नळ योजनेला जोडल्यास ग्रामस्थांना दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा करणे सहज शक्यत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई