शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

'स्टोरी टेल'च्या धर्तीवर आता राज्यात 'महाराष्ट्र टेल', सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

By महेश सायखेडे | Updated: October 2, 2022 16:21 IST

Sudhir Mungantiwar: महाराष्ट्रातील ८५० शूरविरांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्टोरी टेलच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र टेल विकसित केले जाईल

- महेश सायखेडे वर्धा  - एकविसव्या शतकात वाचन कमी होत आहे. इतकेच नव्हे तर विविध विषयांची माहिती स्ट्रोरी टेलच्या माध्यमातून आत्मसात केली जात आहे. महाराष्ट्रातील ८५० शूरविरांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्टोरी टेलच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र टेल विकसित केले जाईल, अशी घोषणा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा येथे केली.जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित हॅलो ऐवजी वंदे मातरम् व ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ तसेच वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार पंकज भोयर यांच्या संकल्पनेतील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचा समारोप प्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पशुसंवर्धन तसेच दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आंतरराष्ट्रीय जल तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, नुकत्याच ३० सप्टेंबरला जागतिक नदी दिवस साजरा करण्यात आला. नदीला आपण आई म्हणतो. देवाने मनुष्य यौनी तयार केली. पण मनुष्यांनी नदींचे शोषण केल्याचे वास्तव आहे. तर आता स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाचे औचित्य साधून जलबिरादरी तसेच जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांचे सहकार्य घेत एक मोठी लोकचळवळ उभी करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील ७५ नद्या अमृत वाहिन्या बनविण्याचा विडा उचलला आहे. नागरिकांनीही या महत्त्वाकांशी उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.

राष्ट्रपित्यांना अभिप्रेत असे काम सेवा पंधरवाड्यात वर्ध्यात झाले : फडणवीसवर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात आला. या सेवा पंधरवाड्यांच्या निमित्ताने राष्ट्रपित्यांना अभिप्रेत असेच काम वर्ध्यात झाले आहे. दारिद्रनारायणाची सेवा ही राष्ट्रसेवा आहे. महाराष्ट्रात नाही असे जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे तयार झाले असून त्याचे उद्घाटनही आज झाले आहे. कार्यालयाची भव्यता इमारतीवरून नाही तर तेथून मिळणाऱ्या सेवेने ठरते. शिवाय वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येकाला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न होईल. वर्ध्यात काढण्यात आलेल्या गॅझेट प्रमाणेच राज्यातील सर्वच जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्यातील सर्वांगीण माहिती असलेले गॅझेट तयार करण्यात येईल, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जल हे खरे अमृत : डॉ. राजेंद्र सिंहदेशात महाराष्ट्र एकटे असे राज्य आहे ज्याने जलयुक्त आणि जल साक्षरता विषयावर मोठे काम केले आहे. जल हे खरे अमृत असून महाराष्ट्रातील ७५ नद्या अमृत वाहिन्या बनविण्यासाठीचा नदी परिक्रमा हा उपक्रम उत्कृष्टच आहे. महाराष्ट्र शासनाने नद्यांचे संवर्धन व्हावे या हेतूने शनिवारी काढलेला शासन निर्णय कौतुकास्पद आहे, असे आंतरराष्ट्रीय जल तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्र