शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पिकाला पोषक पाऊस, मात्र जलाशये तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना  पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्‍यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये रे ये रे पावसाच करीत आहेत. तालुक्यात सध्या केवळ पिकांना पुरेसा असा पाऊस बरसला. मात्र दमदार पाऊस होऊन नद्यांना पूर गेला, असा पाऊस कुठे पडला नाही.

ठळक मुद्देसमुद्रपूर तालुक्यातील प्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा,पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, समुद्रपूर तालुक्यात या म्हणीच्या उलट झाले आहे. पावसाळा सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे तालुक्यात पाऊसच खोटा झाल्याची सध्याची परिस्थिती आहे. पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना  पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्‍यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये रे ये रे पावसाच करीत आहेत. तालुक्यात सध्या केवळ पिकांना पुरेसा असा पाऊस बरसला. मात्र दमदार पाऊस होऊन नद्यांना पूर गेला, असा पाऊस कुठे पडला नाही. सध्या जुलै सुरू आहे. अजूनपर्यंत तालुक्यातील प्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. शेतकऱ्यांना खरीप हंगाम सध्यातरी बरा आहे. पुढे अशीच परिस्थिती राहिली तर रब्बी हंगामात चांगलीच दमछाक होणार आहे. तालुक्यातील सर्वच मध्यम प्रकल्पाची परिस्थिती सध्यातरी एवढी चांगली नाही. तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त फरक नाही. तालुक्याला पाणीपुरवठा करणारा लालनाला, पोथरा प्रकल्पाची पातळी अद्याप २५ टक्‍क्‍यांच्या खालीच आहे.   त्यामुळे उन्हाळ्यात समुद्रपूर तालुक्यात व ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही, एवढा पाऊस होऊन गरजेचे आहे. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिली. दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने परत जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रकल्प हाऊसफुल्ल झाले आहेत.मात्र, तालुक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणीच पाऊस बरसत असल्याने या तालुक्याला वरुणदेवाने या यादीतून वगळले काय, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. ऑगस्टमध्ये दमदार पाऊस आला तर शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल. मात्र, सध्या पावसाला जोर नसल्याने विहिरींची पातळीसुद्धा वाढलेली नाही. तर प्रकल्पाचे दिवास्वप्न पाहणे चुकीचे ठरेल. खरिपाच्या पिकांची स्थिती आतापर्यंतच्या पावसाने चांगली झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी, शेतमजूर आतापर्यंत झालेल्या पावसाने समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, अजूनही आठवडाभरात दमदार पाऊस पडला नाही तर पुढील काळात नागरिकांसह प्रशासनाच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. 

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण