शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पिकाला पोषक पाऊस, मात्र जलाशये तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना  पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्‍यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये रे ये रे पावसाच करीत आहेत. तालुक्यात सध्या केवळ पिकांना पुरेसा असा पाऊस बरसला. मात्र दमदार पाऊस होऊन नद्यांना पूर गेला, असा पाऊस कुठे पडला नाही.

ठळक मुद्देसमुद्रपूर तालुक्यातील प्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा,पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, समुद्रपूर तालुक्यात या म्हणीच्या उलट झाले आहे. पावसाळा सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे तालुक्यात पाऊसच खोटा झाल्याची सध्याची परिस्थिती आहे. पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना  पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्‍यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये रे ये रे पावसाच करीत आहेत. तालुक्यात सध्या केवळ पिकांना पुरेसा असा पाऊस बरसला. मात्र दमदार पाऊस होऊन नद्यांना पूर गेला, असा पाऊस कुठे पडला नाही. सध्या जुलै सुरू आहे. अजूनपर्यंत तालुक्यातील प्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. शेतकऱ्यांना खरीप हंगाम सध्यातरी बरा आहे. पुढे अशीच परिस्थिती राहिली तर रब्बी हंगामात चांगलीच दमछाक होणार आहे. तालुक्यातील सर्वच मध्यम प्रकल्पाची परिस्थिती सध्यातरी एवढी चांगली नाही. तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त फरक नाही. तालुक्याला पाणीपुरवठा करणारा लालनाला, पोथरा प्रकल्पाची पातळी अद्याप २५ टक्‍क्‍यांच्या खालीच आहे.   त्यामुळे उन्हाळ्यात समुद्रपूर तालुक्यात व ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही, एवढा पाऊस होऊन गरजेचे आहे. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिली. दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने परत जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रकल्प हाऊसफुल्ल झाले आहेत.मात्र, तालुक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणीच पाऊस बरसत असल्याने या तालुक्याला वरुणदेवाने या यादीतून वगळले काय, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. ऑगस्टमध्ये दमदार पाऊस आला तर शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल. मात्र, सध्या पावसाला जोर नसल्याने विहिरींची पातळीसुद्धा वाढलेली नाही. तर प्रकल्पाचे दिवास्वप्न पाहणे चुकीचे ठरेल. खरिपाच्या पिकांची स्थिती आतापर्यंतच्या पावसाने चांगली झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी, शेतमजूर आतापर्यंत झालेल्या पावसाने समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, अजूनही आठवडाभरात दमदार पाऊस पडला नाही तर पुढील काळात नागरिकांसह प्रशासनाच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. 

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण