शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय?', सदाभाऊ खोत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 17:14 IST

'महापुराच्या विषयावरुन राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. रिकामटेकडे निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून लोकांची मनं भडकावून सरकारविरोधात वातावरण तयार करायचं काम करत आहेत', असंही खोत म्हणाले.

वर्धा  : 'पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? पुराच्या वेळी आले असते, पाण्यात उतरले असते तर स्वागत केलं असतं', अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणं-घेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

स्वातंत्र्यदिन सोहळ्याला मंत्री सदाभाऊ खोत आज वर्ध्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 'कोल्हापूर, सातारा, सांगलीत महापुराने मोठं नुकसान झालं आहे. सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभं आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यांना पुराशी देणंघेणं नसून कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, असा आरोप सदाभाऊंनी केला आहे. 'महापुराच्या विषयावरुन राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. रिकामटेकडे निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून लोकांची मनं भडकावून सरकारविरोधात वातावरण तयार करायचं काम करत आहेत', असंही खोत म्हणाले.

येत्या विधानसभेत आमदारकीच्या जागा कशा वाढतील, यादृष्टीनं राष्ट्रवादी काम करत आहे. हा मदत करण्याचा काळ आहे. पण राष्ट्रवादी राजकारणाचा फार्स करत आहे, अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सांगली, कोल्हापुरातील पुरानंतर आता भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पुन्हा अशी परिस्थिती उद्भवल्यास लोकांना बाहेर जाण्याचे पर्यायी मार्ग तयार करावे लागणार आहेत. पुलांची उंची वाढवावी लागणार आहे. या सरकारनं मदतीच्या अर्थसहाय्यत मोठी वाढ केली आहे, असंही खोत यांनी सांगितले.

यावेळी सदाभाऊंनी यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवरही टीका केली. '2005 मध्ये यांचं सरकार असताना पूर आला तेव्हा पर्यायी व्यवस्थेवर काम का केलं नाही. त्यावेळी किती मदत द्यायचे? याचे आकडे जाहीर करावे. मावळ घटनेवेळी, ऊस उत्पादक आंदोलनप्रसंगी यांचं शेतकरी प्रेम कुठं गेलं होतं? असा प्रश्नही खोत यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत NCPराष्ट्रवादी काँग्रेसKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर