शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

२६० हेक्टरवरील तूर पिकावर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 6:00 AM

धुक्याच्या सावटाने आर्वी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अतीथंडी व धूक्यामुळे उभ्या तुरीवर दव गेल्याने तूर पीक वाकल्यागत अवस्थेत बघावयास मिळत आहे. तूर पिकावरील या व्हायरस गोगामुळे आर्वी तालुक्यातील २६० हेक्टरवरील पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देथंडी, धुके अन् दवाने वाढविली चिंता । गोगा व्हायरसचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील आठ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह धुक्याचे सावट आहे. इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस पारा खाली सरकत आहे. यामुळे तूर पिकाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अशातच तूर पिकावर गोगा व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत असून पीकही वाकल्यागत दिसून येत आहे. एकूणच तालुक्यातील २६० हेक्टरवरील तूर पिकांवर सध्या निसर्गाची वक्रदृष्टीच असल्याचे शेतकरी सांगतात.धुक्याच्या सावटाने आर्वी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अतीथंडी व धूक्यामुळे उभ्या तुरीवर दव गेल्याने तूर पीक वाकल्यागत अवस्थेत बघावयास मिळत आहे. तूर पिकावरील या व्हायरस गोगामुळे आर्वी तालुक्यातील २६० हेक्टरवरील पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. रोख पीक म्हणून तूर पिकाकडे बघितले जाते. परंतु, डिसेंबर महिन्यात याच पिकावर किडींनी अटॅक केला. तर आता निसर्गाची वक्रदृष्टीच या पिकावर पडली आहे. परतीच्या पावसामुळे पूर्वीच तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला. अशातच खरिपातील सोयाबीनचे उत्पन्नही समाधानकारक राहिले नाही. परतीच्या पावसाचा फटकाच सोयाबीन पिकाला बसला. कपाशी पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनातही घट येत आहे. शिवाय कपाशीने दगा दिल्याने तूर पिकावर तालुक्यातील शेतकऱ्यांची भिस्त होती. परंतु, मागील आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्यातील वाठोडा, वागदा, अहिरवाडा, इठलापूर, नांदपूर, सर्कसपूर, निंबोली (शेंडे), लाडेगाव, टाकरखेडा, जळगाव, वर्धमनेर, देऊरवाडा, टोणा, एकलारा, मांडला, सावलापूर, हरदेली, गुमगाव, दहेगाव, पाचेगाव, पिंपळखुटा, खुबगाव, नांदोरा, रोहणा, वडगाव, चिंचोली, पाचोड यासह तालुक्यातील २६ गावामधील २६० तूर पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा ‘अटॅक’चिकणी (जामणी) : मागील काही दिवसांपासून परिसरात ढगाळी वातावरण आहे. या ढगाळी वातावरणामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तूर उत्पादकांना पिकावर फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणार असून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वास्तविक पाहला २०१९ हे वर्ष शेतकऱ्यांच्या अडचणीत वेळोवेळी भर टाकणारेच ठरले आहे. खरिपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिला. तर त्यानंतरच्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला. कसे बसे कपाशी पीक बहरले असता त्यावर गुलाबी बोंडअळीने अटॅक केला. तर आता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर थंडीतही वाढ झाली असून पहाटेच्या सुमारास दव पडत असल्याने चणा व गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. एकूणच यंदाच्या वर्षी शेतमालाला मिळत असलेल्या भावाच्या तुलनेत परिसरातील शेतकºयांना उत्पादन खर्च जादाच लागल्याचे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. शेतातील तणाची विल्हेवाट लावताना परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर केला. अशातच काही शेतकऱ्यांना कपाशी पिकाला मुकावे लागले. तर परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे कंबर्डे मोडले. सध्या तूर पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतु, अळीचा प्रादुर्भाव या पिकावर असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी करावी लागतेय तारेवरची कसरतचिकणी (जामणी) परिसरात रोही, रान डुक्कर आदी वन्यप्राण्यांचे मोठाले कळप आहेत. त्यांच्याकडून कापूस, तूर, चणा, गहू आदी पिकांची नासाडी केली जात आहे. शेतातील उभ्या पिकाच्या संगोपनासह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी आहे.