शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

गारपीटग्रस्तांच्या यादीत भूमिहिनांची नावे

By admin | Updated: July 7, 2014 23:43 IST

फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील रबी पीक खराब झाले. या नुकसानीचा सर्व्हे करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या; पण येथील तलाठ्याने

चौकशीची मागणी : नुकसान झालेले शेतकरी मदतीपासून वंचितसेलगाव (लवणे) : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील रबी पीक खराब झाले. या नुकसानीचा सर्व्हे करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या; पण येथील तलाठ्याने सर्व्हे न करता खोटा अहवाल सादर केला. या अहवालात गावातील भूमिहीनांची नावे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे या अहवालाची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रबी हंगामात आलेल्या पावसात शेतातील गहू, चना, संत्रा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे शेतात जाऊन करणे गरजेचे असताना तलाठ्याने कार्यालयात बसून सर्व्हे केला. खोटे पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आला़ हा अहवाल शासनास सादर करण्यात आला़ या यादीत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात संत्रा बागा नाहीत, त्यांच्या नावावरही संत्रा बागा दाखवून अनुदान मिळवून देण्यात आले़ भूमिहीनांच्या नावे सातबारा नाही, त्यांची नावेही गारपीटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत; पण पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तलाठ्याने यादीतून वगळले आहे. याबाबत तलाठ्यास विचारणा केली असता, तो कुणाचेही ऐकून घेण्यास तयार नाही़ यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार बालपांडे यांच्याकडे तक्रार केली; पण तहसीलदारांनीही याकडे विशेष लक्ष दिले नाही. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून वगळलेल्या शेतकऱ्यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करावी व भूमिहीनाला लाभ मिळवून देणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. खरोखरच गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने ते हतबल झाले आहेत़(वार्ताहर)