शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

वर्धेतून धावणार नागपूर-मुंबई ‘बुलेट ट्रेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 5:00 AM

ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाकडून नागपूर - मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प नियोजित आहे. त्यासाठी जीपीएस टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे. जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाला पाठवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बारा ठिकाणी राहणार थांबे२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या नागपूर - मुंबई या बुलेट ट्रेनचे तब्बल बारा ठिकाणी थांबे राहणार आहेत. यात वर्धा जिल्ह्यातील दोन ठिकाणांचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यातील केवळ २३ एकर जमीन होणार अधिग्रहितनागपूर - मुंबई ही बुटेल ट्रेन समृद्धी महामार्गाच्या शेजारून धावणार असून, त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करतानाच अर्ध्याहून अधिक जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी २३ एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पनॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लि.च्यावतीने पूर्णत्वास येणारा हा प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने होणार आहे. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प राज्य व केंद्र शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर याचा राज्यातील तब्बल १३ जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प केंद्र सरकारकडून नियोजित असून, त्याबाबतची पर्यावरण व सामाजिक विचार-विनिमयाबाबतची सभा सोमवार, २२ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. या सभेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती शासनाला पाठवली जाणार आहे.- मनोजकुमार खैरनार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वर्धा.

२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार बुलेट ट्रेन

नागपूर ते मुंबईपर्यंतचा बुलेट ट्रेनचा एकूण मार्ग ७५३ किलोमीटरचा राहणार आहे. या रेल्वे मार्गावर ३५० किलोमीटर प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन धावेल, अशा गुणवत्तेचा हा रेल्वे रुळ राहणार आहे. इतकेच नव्हे तर ही बुलेट ट्रेन २५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे