शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

कारयात्रेतून ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:26 PM

सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.

ठळक मुद्देबापूकुटीत राष्ट्रपित्याला अभिवादन : बापूंच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिल्ली ते बांगलादेश प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ही विशेष कार यात्रा काढण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पूणे येथून ही कार यात्रा वर्धेत रविवारी उशीरा दाखल झाली. यात्रेकरूंनी सोमवारी सकाळी बापूकूटीत नतमस्तक होऊन राष्ट्रपित्याला अभिवादन केले. त्यानंतर ही कार यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली. भारत सरकारच्या पुढाकाराने कलिंगा मोटर स्पोर्टस् क्लब भुवनेश्वर उडिसा यांच्या सहकार्याने ही कार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने यात्रेकरू नागरिकांना ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश देत आहेत.आठ महिलांचा समावेशया कार यात्रेत वेगवेळ्या विभागाचे लोक व नागरिक सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर आठ महिलांसह २२ पुरुषांचा त्यात समावेश असून गांधीजींचे सचिव म्हणून काम केलेले ९७ वर्षीय व्ही. लल्यानम् ही दिल्ली ते पुणेपर्यंत यात्रेत सहभागी झाले होते.वाहतूक नियमांचे पटवून देत आहेत महत्त्वरस्ता सुरक्षा सप्ताह अभियाना अंतर्गत ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेची सुरूवात दिल्लीच्या राजघाट येथून झाली असून यात्रेतील सहभागी मान्यवर नागरिकांना वाहन चालविताना वाहतूक नियम पाळणे कसे फायद्याचे ठरते हे पटवून देत आहेत. शिवाय जीव लाखमोलाचा आहे, याचे भान ठेऊन वाहनचालकांनी वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, हेही ते पटवून देत आहेत.३,००० कि.मी. प्रवास पूर्णदिल्ली ते सेवाग्राम असा तीन हजार कि़मी.चा प्रवास या यात्रेकरूंनी आतापर्यंत पूर्ण केला आहे. सोमवारी ही यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली असून ती मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, ऊत्तराखंड, बंगाल होत बांग्लादेश येथे जाणार आहे. त्यानंतर आगरा, म्यानमार येथे पोहोचेल. २५ फेबु्रवारीला या कार यात्रेचा समारोप होणार आहे.भारत सरकारच्या अभियान अंतर्गत ही यात्रा आहे. सडक सुरक्षा जनजागृती आणि गांधीजींचा विचारांचा प्रचार करण्याचे काम या अभियानातून आम्ही करीत आहो. ही कार यात्रा ७,२५० कि.मी.ची असून सर्वत्र च़ागला प्रतिसाद मिळत आहे.- लाजप्रत प्रसाद, यात्रेतील सहभागी सदस्य.