शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

महिलांच्या न्याय रक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा मंत्रालयावर धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 17:16 IST

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हिंगणघाट जळीत कांडातील पिडीत तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दारोडा येथे आज आले होते.

हिंगणघाट - हिंगणघाट येथे घडलेल्या प्राध्यापक तरुणीवर झालेल्या अत्याचारासोबतच राज्यातील महिला व मुलींच्या न्याय रक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाद्वारे 27 फेब्रुवारीला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील (परळी) हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हिंगणघाट जळीत कांडातील पिडीत तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दारोडा येथे आज आले होते. सदर कुटुंबियांना मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने दिलासा देण्यात आला. त्या नंतर हिंगणघाट येथे झालेल्या वार्ताहर परिषदेत या संदर्भातील मागण्या 26 फेब्रुवारी पर्यंत मान्य न झाल्यास 27 फेब्रुवारीला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असे आबासाहेब पाटील यांनी जाहीर केले.

पिडीत कुटुंबाला 25 लाख रुपयांची त्वरीत मदत करण्यात यावी,पिडीतेच्या भावाला शासनाने तात्काळ शासकिय नोकरी द्यावी,या प्रकरणाचे आरोप पत्र तात्काळ न्यायालयात दाखल करण्यात यावे, प्रकरणाची तात्काळ जलद गती न्यायालयातुन सुनावणी करण्यात यावी,सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात यावे इत्यादी मागण्यांसोबतच महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने यापुढे महाराष्ट्र शासनाने अशा घटनेतील आरोपीला एक महिन्यात फाशीची शिक्षा करण्याचा कायदा करावा अशा मागण्या मराठा ठोक मोर्चाद्वारे पुढे करण्यात आल्या आहेत. या वार्ताहर परिषदेला संघटनेचे राज्य कार्यकारीणी पदाधिकार्‍यां सोबतच हिंगणघाटचे शरदराव शिर्के, प्रविन काळे व अक्षय भांडवलकर यांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbaiमुंबईPoliceपोलिस