शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

माणिकवाडा-तारासावंगा रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:42 AM

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा-तारासावंगा हा रस्ता पूर्ण उखडल्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच नियोजित ठिकाणी जावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्ता दुरूस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा-तारासावंगा हा रस्ता पूर्ण उखडल्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच नियोजित ठिकाणी जावे लागत आहे. गत दोन वर्षांपासून सदर रस्त्याच्या दुरूस्तीकडे जि.प.च्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून ग्रामस्थांची समस्या लक्षात घेता तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी आहे.माणिकवाडा ते तारासावंगा हे अंतर ६ कि़मी. आहे. त्यापैकी २ कि़मी. रस्ता पूर्णत: उखडला आहे. या रस्त्याची रुंदी पूर्वी तीन मिटर होती; पण आता दोन्ही बाजू दबल्याने दोन मिटर झाल्याचे दिसते. या मार्गाने वाहनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय रस्ताही अरुंद झाल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सरपंचासह काही ग्रामस्थांनी संबंधितांना निवेदने दिली. मात्र, तेही दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत. आतापर्यंत सदर रस्त्यावर छोटे-मोठे सुमारे ४० अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता रस्त्याच्या दुरूस्तीच्या मागणीचे निवेदन संबंधितांना देण्यात आले. परंतु, तेही दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांची समस्या कायम आहे. विशेष म्हणजे, जि. प. बांधकाम विभागाच्या विरोधात निषेध ठराव घेऊन तो राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. जि. प. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण होत असून त्यावर आता काय कार्यवाही होते तसेच संबंधित अधिकारी ग्रामस्थांची समस्या किती तातडीने निकाली काढतात याकडे साºयाचे लक्ष लागले आहे.