शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

दोन दिवस तापाने फणफणला, रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 14:19 IST

परसोडा गावात हळहळ : दिवाळीकरिता गावाकडे आला अन् नियतीने डाव साधला, कुटुंबातील कर्तबगार मुलगा गेल्याने धक्का

नीलेश कोहळे

आष्टी (शहीद) : तालुक्यातील परसोडा या छोट्याशा गावात जन्मलेल्या मुलाने शेतकरी बापाच्या कष्टाची कदर करून शिक्षण घेतले. शासकीय नोकरीच्या मागे न लागता अमरावतीसारख्या शहरात भोजनालय टाकून स्वयंरोजगाराची कास धरून आई-वडिलांना आर्थिक आधार दिला. त्यामुळे या कर्तृत्ववान मुलाने गावकऱ्यांच्या मनातही जागा निर्माण केली होती. अशातच तो परिवारासोबतच दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावाकडे आला. दोन दिवस तापाने फणफणत राहिल्याने रुग्णालयात दाखल केले असता रविवारी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्याच्या या आकस्मिक मृत्यूने परिवारच नाही तर अख्खं गाव हळहळलं. परसोडाकरांनी साश्रूनयनाने त्याला अखेरचा निरोप दिला.

भूषण पंडित गोरे (३२, रा. परसोडा) असे या मृत युवकाचे नाव आहे. त्याचे वडील पंडित गोरे यांच्याकडे आठ एकर शेती असून त्यांना दोन मुली व एक मुलगा, असा आप्तपरिवार आहे. त्यांनी मुलांना शिक्षण दिल्यानंतर शेतीकडे वाटचाल कायम ठेवली. भूषण याने वडिलांचे काबाडकष्ट पाहून शासकीय नोकरीची प्रतीक्षा न करता अमरावतीमध्ये भोजनालय सुरू करून अर्थार्जन सुरू केले. सोबतच पाच व्यक्तींना कायमचा रोजगारही दिला. सोबतच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याचेही काम सुरू केले.

विनम्र आणि सेवाभावी असलेल्या भूषणच्या स्वभावामुळे त्याने अनेकांच्या मनात घर केले होते. यामुळेच त्याचा व्यवसायही भरभराटीस आला होता. दिवाळीला भूषण गावाकडे आला. त्याला अचानक ताप आल्याने दोन दिवस फणफणला. ताप आणखीच वाढल्याने तातडीने अमरावती येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची वार्ता गावात पसरता गावात शोककळा पसरली. अचानक भूषण आपल्यातून निघून गेल्याच्या घटनेवर अनेकांना सुरुवातीला विश्वासही बसला नाही; पण वार्ता खरी ठरल्यानंतर साऱ्यांवरच दु:खाचा डोंगर कोसळला. रविवारी गावकऱ्यांनी साश्रूनयनांनी भूषणला अखेरचा निरोप दिला. आ. दादाराव केचे यांनीही परिवाराची भेट घेऊन सात्वन केले. भूषणच्या अचानक जाण्यामुळे ग्रामीण भागामध्ये तापाची साथ जोर धरू लागली, हे आता स्पष्ट झाले असून सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे भूषणचे वडील पंडित गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गावकऱ्यांचा उपवास, चुली पेटल्याच नाही!

गावातील भूषण पंडित गोरे या अविवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरताच सारेच स्तब्ध झाले. गावकऱ्यांसह दिवाळीनिमित्ताने गावात आलेल्या पाहुण्यांनीही हळहळ व्यक्त केली. गावात भूषणवर अंत्यसंस्कार होईस्तोवर गावातील एकाही घरामध्ये चूल पेटली नसल्याने साऱ्यांनीच उपवास धरला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सारेच एकत्र आले. आजूबाजूच्या गावातील नागरिकही त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. त्याच्या निधनाने परिवाराचा आधार हिरावल्याचे दु:ख अनेकांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यूwardha-acवर्धा