शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

दोन दिवस तापाने फणफणला, रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 14:19 IST

परसोडा गावात हळहळ : दिवाळीकरिता गावाकडे आला अन् नियतीने डाव साधला, कुटुंबातील कर्तबगार मुलगा गेल्याने धक्का

नीलेश कोहळे

आष्टी (शहीद) : तालुक्यातील परसोडा या छोट्याशा गावात जन्मलेल्या मुलाने शेतकरी बापाच्या कष्टाची कदर करून शिक्षण घेतले. शासकीय नोकरीच्या मागे न लागता अमरावतीसारख्या शहरात भोजनालय टाकून स्वयंरोजगाराची कास धरून आई-वडिलांना आर्थिक आधार दिला. त्यामुळे या कर्तृत्ववान मुलाने गावकऱ्यांच्या मनातही जागा निर्माण केली होती. अशातच तो परिवारासोबतच दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावाकडे आला. दोन दिवस तापाने फणफणत राहिल्याने रुग्णालयात दाखल केले असता रविवारी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्याच्या या आकस्मिक मृत्यूने परिवारच नाही तर अख्खं गाव हळहळलं. परसोडाकरांनी साश्रूनयनाने त्याला अखेरचा निरोप दिला.

भूषण पंडित गोरे (३२, रा. परसोडा) असे या मृत युवकाचे नाव आहे. त्याचे वडील पंडित गोरे यांच्याकडे आठ एकर शेती असून त्यांना दोन मुली व एक मुलगा, असा आप्तपरिवार आहे. त्यांनी मुलांना शिक्षण दिल्यानंतर शेतीकडे वाटचाल कायम ठेवली. भूषण याने वडिलांचे काबाडकष्ट पाहून शासकीय नोकरीची प्रतीक्षा न करता अमरावतीमध्ये भोजनालय सुरू करून अर्थार्जन सुरू केले. सोबतच पाच व्यक्तींना कायमचा रोजगारही दिला. सोबतच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याचेही काम सुरू केले.

विनम्र आणि सेवाभावी असलेल्या भूषणच्या स्वभावामुळे त्याने अनेकांच्या मनात घर केले होते. यामुळेच त्याचा व्यवसायही भरभराटीस आला होता. दिवाळीला भूषण गावाकडे आला. त्याला अचानक ताप आल्याने दोन दिवस फणफणला. ताप आणखीच वाढल्याने तातडीने अमरावती येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची वार्ता गावात पसरता गावात शोककळा पसरली. अचानक भूषण आपल्यातून निघून गेल्याच्या घटनेवर अनेकांना सुरुवातीला विश्वासही बसला नाही; पण वार्ता खरी ठरल्यानंतर साऱ्यांवरच दु:खाचा डोंगर कोसळला. रविवारी गावकऱ्यांनी साश्रूनयनांनी भूषणला अखेरचा निरोप दिला. आ. दादाराव केचे यांनीही परिवाराची भेट घेऊन सात्वन केले. भूषणच्या अचानक जाण्यामुळे ग्रामीण भागामध्ये तापाची साथ जोर धरू लागली, हे आता स्पष्ट झाले असून सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे भूषणचे वडील पंडित गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गावकऱ्यांचा उपवास, चुली पेटल्याच नाही!

गावातील भूषण पंडित गोरे या अविवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरताच सारेच स्तब्ध झाले. गावकऱ्यांसह दिवाळीनिमित्ताने गावात आलेल्या पाहुण्यांनीही हळहळ व्यक्त केली. गावात भूषणवर अंत्यसंस्कार होईस्तोवर गावातील एकाही घरामध्ये चूल पेटली नसल्याने साऱ्यांनीच उपवास धरला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सारेच एकत्र आले. आजूबाजूच्या गावातील नागरिकही त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. त्याच्या निधनाने परिवाराचा आधार हिरावल्याचे दु:ख अनेकांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यूwardha-acवर्धा