शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस तापाने फणफणला, रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 14:19 IST

परसोडा गावात हळहळ : दिवाळीकरिता गावाकडे आला अन् नियतीने डाव साधला, कुटुंबातील कर्तबगार मुलगा गेल्याने धक्का

नीलेश कोहळे

आष्टी (शहीद) : तालुक्यातील परसोडा या छोट्याशा गावात जन्मलेल्या मुलाने शेतकरी बापाच्या कष्टाची कदर करून शिक्षण घेतले. शासकीय नोकरीच्या मागे न लागता अमरावतीसारख्या शहरात भोजनालय टाकून स्वयंरोजगाराची कास धरून आई-वडिलांना आर्थिक आधार दिला. त्यामुळे या कर्तृत्ववान मुलाने गावकऱ्यांच्या मनातही जागा निर्माण केली होती. अशातच तो परिवारासोबतच दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावाकडे आला. दोन दिवस तापाने फणफणत राहिल्याने रुग्णालयात दाखल केले असता रविवारी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्याच्या या आकस्मिक मृत्यूने परिवारच नाही तर अख्खं गाव हळहळलं. परसोडाकरांनी साश्रूनयनाने त्याला अखेरचा निरोप दिला.

भूषण पंडित गोरे (३२, रा. परसोडा) असे या मृत युवकाचे नाव आहे. त्याचे वडील पंडित गोरे यांच्याकडे आठ एकर शेती असून त्यांना दोन मुली व एक मुलगा, असा आप्तपरिवार आहे. त्यांनी मुलांना शिक्षण दिल्यानंतर शेतीकडे वाटचाल कायम ठेवली. भूषण याने वडिलांचे काबाडकष्ट पाहून शासकीय नोकरीची प्रतीक्षा न करता अमरावतीमध्ये भोजनालय सुरू करून अर्थार्जन सुरू केले. सोबतच पाच व्यक्तींना कायमचा रोजगारही दिला. सोबतच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याचेही काम सुरू केले.

विनम्र आणि सेवाभावी असलेल्या भूषणच्या स्वभावामुळे त्याने अनेकांच्या मनात घर केले होते. यामुळेच त्याचा व्यवसायही भरभराटीस आला होता. दिवाळीला भूषण गावाकडे आला. त्याला अचानक ताप आल्याने दोन दिवस फणफणला. ताप आणखीच वाढल्याने तातडीने अमरावती येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची वार्ता गावात पसरता गावात शोककळा पसरली. अचानक भूषण आपल्यातून निघून गेल्याच्या घटनेवर अनेकांना सुरुवातीला विश्वासही बसला नाही; पण वार्ता खरी ठरल्यानंतर साऱ्यांवरच दु:खाचा डोंगर कोसळला. रविवारी गावकऱ्यांनी साश्रूनयनांनी भूषणला अखेरचा निरोप दिला. आ. दादाराव केचे यांनीही परिवाराची भेट घेऊन सात्वन केले. भूषणच्या अचानक जाण्यामुळे ग्रामीण भागामध्ये तापाची साथ जोर धरू लागली, हे आता स्पष्ट झाले असून सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे भूषणचे वडील पंडित गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गावकऱ्यांचा उपवास, चुली पेटल्याच नाही!

गावातील भूषण पंडित गोरे या अविवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरताच सारेच स्तब्ध झाले. गावकऱ्यांसह दिवाळीनिमित्ताने गावात आलेल्या पाहुण्यांनीही हळहळ व्यक्त केली. गावात भूषणवर अंत्यसंस्कार होईस्तोवर गावातील एकाही घरामध्ये चूल पेटली नसल्याने साऱ्यांनीच उपवास धरला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सारेच एकत्र आले. आजूबाजूच्या गावातील नागरिकही त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. त्याच्या निधनाने परिवाराचा आधार हिरावल्याचे दु:ख अनेकांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यूwardha-acवर्धा