शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

बैलजोडी सांभाळणे झाले ट्रॅक्टरपेक्षा जास्त महागडे; चाऱ्याला डिझेलइतका भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:13 IST

भाड्याच्या बैलजोडीवर शेतकऱ्यांची भिस्त : महागाईने कंबरडे मोडले

विनोद घोडेलोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामनी) : चाराटंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, बैलजोडीची किंमतही लाखात गेल्यामुळे बैलजोडी सांभाळणे सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीची विभागणी झाल्याने बहुतांश शेतकरी अल्पभूधारक झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात चाराटंचाई असल्याने चाऱ्याच्या दराने डिझेलची बरोबरी गाठली आहे. परिणामी बैलजोडी सांभाळणे कठीण झाले आहे.

हल्लीच्या काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांना ना बैलजोडीच्या साह्याने शेती करणे परवडते ना ट्रॅक्टर घेऊन. यामुळे बहुतांश शेतकरी भाड्या-भुसाऱ्याने शेती कसत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते. पण शेतीची आंतरमशागत करण्यासाठी बैलांची आवश्यकता भासते. आता बैलांच्या किमती लाखात पोहोचल्याने आणि बैलांचा सांभाळ करण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने शेतीच्या मशागतीसाठी बैल खरेदी करण्यापेक्षा ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दिवसेंदिवस शेती करणे आता कठीण होत आहे. खते, बियाणे, औषधी यांचा खर्च गगनाला भिडला असतानाच शेतीवर नफा मिळणे कठीण झाले आहे. यातच सालगड्याचे भाव एका वर्षासाठी दीड लाखांच्या घरात पोहोचले आहेत. एवढे पैसे देऊनही जनावरांचे संगोपन करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. यातच आता गेल्या काही वर्षात बैलांच्या किमती भडकल्या आहेत. सर्वसाधारण बैलजोडी दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या घरात पोहोचली आहे. 

लागवड कमी झाल्याने कडब्याचा भावही कडाडला२५ वर्षांपूर्वी ज्वारी, तुरीचे कुटार व कडबा हे पाळीव जनावरांचे मुख्य खाद्य होते. पण काळाच्या ओघात ज्वारीचे उत्पादन पडद्याआड झाले. आता तर अंत्यविधीसाठीही कडबा मिळणे कठीण आहे. लागवडीअभावीच कडब्याचे भाव कडाडले आहेत.

पेंडीप्रमाणे विक्री...जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जात नाही. परिणामी कडबा हद्दपार झाला असून मक्याच्या पेंडीला मागणी वाढली आहे. सध्या १० रुपये प्रतिपेंडी भाव आहे.

खुट्याला जनावर नाही राहिले; बाजार फुल्ल व्हायला लागलेजिल्ह्यात देवळी येथील बैलबाजार विदर्भात प्रसिद्ध आहेत. येथे राज्यातूनच नव्हे तर परप्रांतातून बैलांची खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी येतात. आता चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने जनावरे सांभाळणे कठीण झाले. विकण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे शेतकऱ्यांचे खुटे मोकळे होत आहेत व बाजार फुल्ल होत आहे.

बैलजोडी नको; त्यापेक्षा जुना ट्रॅक्टर परवडलाबैलांच्या किमती भडकल्याने व संगोपणाला परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा ओढा ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे. यातच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व यंत्र खरेदीसाठी शासनाच्यावतीने अनुदान दिले जात आहे.

आता तर गहू, तूर, हरभऱ्याचे कुटारही मिळेनात...अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाने अधिक प्रगती केली आहे. शेती व्यवसायात सुद्धा यंत्रांचा वापर अधिक प्रमाणात वाढला. गहू, तूर, सोयाबीन आदी पिकांची मळणी हार्वेस्टरद्वारे केल्यामुळे कुटार जनावरांच्या खाण्यायोग्य राहत नाही. परिणामी कुटार मिळणे कठीण झाले आहे.

दुभते जनावर खरेदीकडे वाढलाय ओढातसे पाहता दुभत्या जनावरांचे संगोपन करणे फार अवघडच आहे. चाऱ्याच्या दरात आणि दुधाच्या दरात कमालीची तफावत आहे. पण शेणखत व दूध मिळत असल्याने दुभत्या जनावरांना मागणी आहे.

बैल घेणे अन् सांभाळणे परवडेना"दीड ते दोन लाख रुपये खर्च करून बैल खरेदी करणे अवघड बनले आहे. इच्छा असूनही बैलजोडी खरेदी करू शकत नाही आणि शेती कमी असल्याने ट्रॅक्टरही झेपत नाही. यामुळे सध्या शेती भाड्या-भुसाऱ्याने कसणे सुरू आहेत."- विजय बेलसरे शेतकरी, जामनी

"मशागतीसाठी बैलजोडी सांभाळणे आता परवडत नाही. यासाठी मोठा खर्च येतो. सालदार मिळत नाही. किमती खूप वाढल्या आहेत. असे असले तरी बैलजोडीशिवाय शेती करणे शक्य नाही."- गजानन घोडे, शेतकरी चिकणी.

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धा