शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन गावातील कामांचा दर्जा सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:54 IST

निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्प्रगस्तांचे पुनर्वसनातील कामे दर्जेदार करावी. तिथे राहणारी हाडामासाची माणसे आहेत याची जाणीव ठेवून पिण्याचे पाणी, शाळा आणि इतर नागरी सुविधांची कामे जबाबदारीने मार्चपूर्वी पूर्ण करावीेत, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिल्यात.

ठळक मुद्देअनुपकुमार : आढावा बैठकीत अधिकाºयांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्प्रगस्तांचे पुनर्वसनातील कामे दर्जेदार करावी. तिथे राहणारी हाडामासाची माणसे आहेत याची जाणीव ठेवून पिण्याचे पाणी, शाळा आणि इतर नागरी सुविधांची कामे जबाबदारीने मार्चपूर्वी पूर्ण करावीेत, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिल्यात.जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.निम्न वर्धा प्रकल्पातील २० गावांतील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेले जमिनीचे पट्टे प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्यात आले. नावाचा उल्लेख असलेला सातबारा या प्रकल्पग्रस्तंना यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे दस्तावेज मिळाले असल्याने त्यांना जिल्हा पुनर्वसन कार्यालयात येण्याची आणि परवानगी घेण्याची गरज नाही. प्रकल्पग्रस्तांना पट्यांचे सातबारा करून देणारा वर्धा हा पहिला जिल्हा आहे, अशी माहिती जिल्हा पुनवर्सन अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी दिली.कृषी पंपाच्या वीज जोडणीचा आढावा घेताना २,५२६ प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना अनुपकुमार यांनी दिल्यात.प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदनही केले. राष्ट्रीय दूध विकास मंडळामार्फत जास्त दूध खरेदी होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच त्यासाठी दुग्धव्यवसाय करू इच्छिणाºया पशुपालकांना प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी यावेळी सुचवले. मेगा फुड पार्क प्रकल्पासाठी काही प्रस्तावांना मान्यता घ्यावयाची असल्यास हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात यावी. पार्क मध्ये २२० केव्हीए उपकेंद्रासाठी ७२ कोटींच्या कामाला मान्यता मिळाली असल्याचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी सांगितले.तलाव तिथे मासळी या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात ८८ तलावांमध्ये यावर्षी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये निर्माण होणाºया यशकथांचे डॉक्युमेंटेशन करून ठेवण्यास अनुपकुमार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले नाविण्यपुर्ण प्रकल्पाची माहिती दिली. यामध्ये रूरल मॉल, शेतकरी उद्योजक कंपन्या, सामुहिक कृषी सुविधा केंद्र, पांदन रस्ते, सार्थक जीवनासाठी गांधी मुल्ये, ई-कार्यालय, वर्धा नियोजन अ‍ॅप, गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणालीबाबत माहिती दिली. या बैठकीला सर्व विभाग प्रमुख, तहसीलदार उपस्थित होते.