शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

शहरातील प्रमुख मार्गाला खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 9:25 PM

शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खोल खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांकरिता जीवघेणे ठरत आहेत. मात्र दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केला आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीकडे डोळेझाक : वाहनचालकांच्या जीविताला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खोल खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांकरिता जीवघेणे ठरत आहेत. मात्र दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केला आहे.प्रमुख मार्गावर राधिका उपाहारगृह परिसरासह अन्य ठिकाणी कित्येक दिवसांपासून खड्डे पडले असून सळाखीही उघड्या पडल्या आहेत. रहदारीकरिता त्या धोक्याच्या ठरत आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना अपघाताला सामोरे लावे लागणार आहे. असे असताना दुरुस्तीच्या दृष्टीने प्रशासन उदासीन आहे. प्रशासनातील अतिमहत्वाचे लोक या सार्वजनिक रस्त्यावरून कधीच ये-जा करीत नाही की, त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे, असा संतप्त सवाल वाहनचालकांतून केला जात आहे.मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याबाबत शासन-प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र कानाडोळा केला जात असल्याचेही पट्टेवार यांनी म्हटले आहे.शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर पडलेल्या खोल खड्डयांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. शाळा कॉलेज सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने व निष्पाप वाहन चालकांच्या जीवावर उठलेले खोल खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पट्टेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.हे आहेत शहरातील खड्ड्यांचे परिसरशहरातील केसरीमल कन्या शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आदिती मेडिकल, राधिका उपाहारगृह, लोकमत कार्यालय, आरती चित्रपटगृह परिसर, यादव कॅन्टीन, इंगोले चौक यासह अन्य परिसरात कित्येक दिवसांपासून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे संपूर्ण परिसर वर्दळीचे आहेत. तरीदेखील प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यात चालढकल केली जात आहे. एखादा अपघात झाल्यानंतरच उपाययोजना करायच्या का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.