शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

महादेवभाई देसाई बनलेय बापूंची सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:41 IST

गांधीजींची ओळख जगाला झाली होती. सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि सामुहिक जीवन पद्धतीमुळे सामान्य ते विद्वान सर्वच स्तरावरील लोकं बापूंकडे आकर्षित झाले होते. बापू १९१५ मध्ये भारतात आले आणि त्यांनी असंख्य युवा वर्गाच्या मनावर अधिराज्य केले.

ठळक मुद्देआश्रमात होते वास्तव्य : स्वातंत्र्यदिनी पुण्यतिथी निमित्त अर्पण करणार श्रद्धांजली

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधीजींची ओळख जगाला झाली होती. सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि सामुहिक जीवन पद्धतीमुळे सामान्य ते विद्वान सर्वच स्तरावरील लोकं बापूंकडे आकर्षित झाले होते. बापू १९१५ मध्ये भारतात आले आणि त्यांनी असंख्य युवा वर्गाच्या मनावर अधिराज्य केले. परिणामी युवावर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी जुळायला लागला. यात महादेवभाई देसाई यांचाही समावेश होता. ते गांधीभक्त म्हणूनच नावारुपास आले आणि बापूंची सावली बनले. आज स्वातंत्र्यदिनी या गांधीभक्ताची पुण्यतिथी असून आश्रमात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.महान स्वातंत्र्य सेनानी महादेवभाई देसाई यांचे १५ आँगस्ट १९४२ रोजी निधन झाले. आज त्यांची ७७ वी पुण्यतिथी आहे. गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्याच्या सरसगाव या खेड्डयात महादेव यांचा जन्म १ जानेवारी १८९२ मध्ये झाला. वडील हरिहर शिक्षक तर आई जमनाबहन धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यामुळे घरातील वातावरण संस्कारी होते. बालवयातच महादेवभाई आईच्या प्रेमाला मुकले.बालपणापासून ते कुशाग्र बुध्दिमान म्हणून ओळखले जाऊ लागले. मँट्रिकनंतरचे त्यांनी शिक्षण शिष्यवृत्ती वर पूर्ण केले. शिकत असतानाच त्यांचा विवाह दुर्गाशी झाला. त्यांना नारायण एकमात्र पूत्र होते. मुंबई सेंट्रल को आँप-रेटिव्ह बँकेत नोकरी करीत असताना होमरुल लिगमध्ये काम करण्याची इच्छा झाली. त्यांनी वकीलीचे शिक्षण घेतले.मित्र नरहरी पारेख यांच्या माध्यमातून महादेवभाईची बापूसोबत पहिली भेट झाली. त्यांनतर त्यांनी बापूृंचे सचिव म्हणून १०० रुपयात काम सुरु केले. पण, सहवासात आल्यानंतर ७५ रुपयात काम करणे पसंत केले. यातूनच कमीत कमी गरजा ठेऊन कसे जगता येईल याची चांगली सवय अंगवळणी बांधली. पुढे ते बापूंचे खऱ्या अर्थाने मानसपुत्र बनले.सेवाग्राम आश्रमची स्थापना करण्यात आल्यानंतर महादेवभाई, दुर्गाबहन आणि नारायण मगनवाडीतून सेवाग्राम आश्रमात आले. आश्रमातील बलवंतसिंह आपल्या पुस्तकात लिहिताना म्हणतात ‘परमहंस रामकृष्ण यांनी स्वामी विवेकानंद यांना ओळखले तसेच बापूंनी महादेव यांना ओळखून महादेव यांचा जन्म माझ्यासाठीच झाला’. दोघांतील जीवन पाहता बापूंचे वाक्य खरेच ठरले. महादेवभाई यांनी २५ वर्षे गांधीजी आणि देशाची सेवा केली. सर्व मित्र त्यांना ‘दरिया दिल’ म्हणत. वर्धेत काँग्रेस वर्कींग कमेटीच्या बैठकीत त्यांचा सहभाग होता. तसेच आदिनिवासमध्ये भारत छोडोचा मसुदा तयार करण्यात आला, तेव्हाही ते उपस्थित होते. ५ आॅगस्ट १९४२ ला मुंबई येथे काँग्रेस वर्कींग कमेटिच्या बैठकीला मुंबईला जाणार होते. त्यावेळी ते सर्व आश्रमवासियांना भेटले आणि हीच त्यांची शेवटची भेट ठरली. मुंबईतील बैठकीनंतर गवालिया टँक मैदानावर सभा झाली आणि भारत छोडोचा ठराव पारीत होऊन गांधीजींनी देशवासियांना संबोधित केले. याचे साक्षीदार ते होते. पण, ९ रोजी पहाटे गांधीजींना अटक झाली. त्यानंतर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व कस्तुरबा यांनी केले. त्यांना महादेवभाईने खंबीरपणे साथ दिली. त्यानंतर कस्तुरबा, महादेवभाई आणि अन्य नेत्यांना अटक करून पुण्याच्या आगाखान पँलेस मध्ये स्थानबद्ध करण्यात आले. बापुंनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे महादेवभाईंना कळले आणि तिथेच त्यांना भोवळ आली. याची माहिती मिळताच बापू, बा, डॉ. सुशिला नायर आले. पण, तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. महादेवची जागा कुणीच घेऊ शकत नाही, महादेव माझी जीवनी लिहिणारे बणणार होते. पण, माझ्या अगोदरच निघून गेले. माझा अंतसंस्कार तू करावा अशी माझी भावना होती. मात्र, आई वडिलांच्या अगोदर पुत्राचे निधन अधिक क्लेशदायक आहे, असे बापूचं उद्गारही बाहेर पडले होते. आज त्यांचाच स्मृतिदिन आहे.बापूंचे सचिव म्हणून स्वीकारली जबाबदारीमहादेवभाई यांचे मित्र नरहरी पारेख यांच्या माध्यमातून अहमदाबाद येथे बापूंसोबत पहिली भेट झाली. यानंतर नरहरी आणि महादेवभाई यांची गांधीजी सोबत चर्चा झाली. यातूनच ३१ आँगस्ट १९१७ ला बापूंचे सचिव म्हणून १०० रूपयावर महादेवभाई यांनी काम सुरू केले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम