शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी उरली नावाला, उठाव 'एमपी'च्या मालाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 17:09 IST

Wardha : एक्साइज, पोलिस करतात काय? सर्रास विक्री, घरपोच डिलिव्हरीची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावालाच उरली आहे. शहरासह जिल्ह्यात सर्रास खुलेआम दारू विकली जात आहे. विशेष म्हणजे केवळ मध्य प्रदेशात विक्रीची परवानगी असलेले विदेशी मद्य धडाक्यात येथे विकले जात आहे. यामुळे मद्य प्राशन करणाऱ्यांना विविध आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्याला थोर महापुरुषांचा वारसा आहे. त्यांच्या जिल्ह्याची ओळख देशात झाली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्रामला वास्तव्य केले. तेथून अनेक चळवळी चालविल्या. विनोबा भावे यांनी स्वातंत्र्यानंतर भूदान चळवळ चालविली. त्यामुळे या जिल्ह्याला देशात आगळेवगळे स्थान आहे. त्याचीच दखल घेत शासनाने १९७४ मध्ये जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली. एकाअर्थाने ती महात्मा गांधी, विनोबा भावे यांना आदरांजली होती त्यांच्याप्रति शासनाने कृतज्ञता व्यक्त केली होती. मात्र, कालांतराने दारूबंदी फसवी निघाली. हा निर्णय केवळ कागदावरच राहिला. 

राज्यात दारूबंदीसाठी उत्पादन शुल्क विभाग निर्माण करण्यात आला आहे. त्यांच्या साथीला पोलिसही आहेत. मात्र, जिल्ह्यात दारूबंदीची पुरती वाट लागली आहे. पोलिस केवळ आपल्या 'सोयी'ने धाडसत्र राबवीत असल्याची चर्चा होऊ लागली आहे. उत्पादन शुल्क विभाग तर कधीच दारूविक्री अथवा साठ्यावर धाड टाकताना दिसत नाही. मग या विभागाची जिल्ह्यात गरजच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पोलिस अनेकदा कारवाई करून वाहनांसह लाखोंचा साठा जप्त केल्याचा गवगवा करतात. आपली पाठ थोपटून घेतात. नंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' असा कार्यक्रम सुरू होतो. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या कार्यकाळात जानेवारी ते मे दरम्यान १४ कोटी ४ लाख ८६ हजार रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. मात्र, आता ही कारवाई काहीशी थंडावल्याचे चित्र दिसून येते. शहरासह जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. 

दारूविक्रेते शिरजोर झाले आहे. विशेष म्हणजे अनेक पोलिसांनाही कुठे दारू विकली जाते, याची इत्थंभूत माहिती आहे. मात्र, कारवाई करण्यास त्यांचे हात धजावताना दिसत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

लगतच्या जिल्ह्यातून होतो पुरवठाजिल्ह्याशेजारी नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्हे आहे. तेथे दारूबंदी नाही. या जिल्ह्यातून येथील दारूविक्रेते दारू आणतात. काही विक्रेते थेट मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीची दारू आणतात. ही दारू चढ्या दराने ग्राहकांना विकली जाते. अनेकदा बनावट दारू विकली जाण्याचाही धोका असतो. यामुळे पिणाऱ्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. मात्र, विक्रेत्यांना केवळ पैशाचा हव्यास दिसून येतो.

चिरीमिरी'मुळे निर्वावले, 'वर्दी'चा वचक दिसेना काही पोलिसांचे दारू विक्रेत्यांशी 'अर्थपूर्ण साटेलोटे असल्याची चर्चा आहे. अनेकदा 'चिरीमिरी' घेऊन प्रकरण दडपले जाते. यामुळे दारू विक्रेते निर्वावले आहे. त्यांना वर्दी'चा धाक उरला नाही. 'वर्दी'च आता 'दर्दी झाल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न आहे. काही ठिकाणी तर खुद्द जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांच्या 'डीबी पथकात कार्यरत असलेले कर्मचारीच खुलेआम दारू ढोसण्यासाठी जात असल्याचेही सांगितले जाते.

फोन करा अन् दारू मागाशहरात अनेक दारू विक्रेते फोन केल्यास इच्छितस्थळी दारू पोहोचवून देतात. फोन करा अन् दारू मागवा, असा हा अफलातून प्रकार आहे. काही ठिकाणी अगदी बारप्रमाणे टेबल, खुर्चा टाकून पेग रिचविले जाते. काही ठिकाणी सत्यम, शिवमचा आव आणत 'एमपी'ची दारू विकली जाते. विशेष म्हणजे पोलिस विभागातील अनेकांना दारुविक्रीची माहिती आहे. तरीही कारवाई होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अशीच स्थिती दिसून येत आहे. नवीन पोलिस अधीक्षक याकडे काळजीने लक्ष देऊन 'झारीतील शुक्राचार्यां'ना शोधून काढतील का, हा खरा प्रश्न आहे. सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने दारुचे पाट वाहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीwardha-acवर्धा