शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

सभास्थळी बैलबंडीतून पोहोचले नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:35 IST

यवतमाळ जिल्ह्यातून निघालेली हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे शुक्रवारी पोहोचली येथे दुपारी ३.३० वाजता बाजार चौकात जाहीर सभा झाली.

ठळक मुद्देहल्लाबोल यात्रा बुद्ध विहारात : भाजपच्या काळात सर्वाधिक आत्महत्या

आॅनलाईन लोकमतकेळझर : यवतमाळ जिल्ह्यातून निघालेली हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे शुक्रवारी पोहोचली येथे दुपारी ३.३० वाजता बाजार चौकात जाहीर सभा झाली. या सभेला हल्लाबोल पदयात्रेत सहभागी असलेले सर्व मान्यवर नेते बैलबंडीतून दाखल झाले. सभेनंतर बुद्धविहारात नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.सेलू येथून सकाळी पदयात्रेला प्रारंभ झाला दुपारी १ वाजता ही पदयात्रा केळझर येथे पोहोचली. पदयात्रेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. भास्कर जाधव, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आ. प्रकाश गजभिये, अनिल देशमुख, सुरेश देशमुख, चित्रा वाघ आदी नेते सहभागी होते. त्यानंतर स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. तेथे दुपारचे जेवण घेतल्यानंतर तेथून बैलबंडीच्या मिरवणूकीसह नेते सभास्थळी दाखल झाले. या सभेत बोलताना अजीत पवार यांनी केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारवर जोरदार टिका केली. शेतकºयाचा सातबारा कोरा झाला नाही. दररोज आत्महत्या वाढत आहे. आघाडी सरकारच्या काळात अनेक शेतकरी हिताचे निर्णय शरद पवार व आम्ही राज्यात घेतले, तसे सांगितले. या सभेला माजी आमदार सुरेश देशमुख, गुलाबराव गावंडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मिलिंद हिवलेकर यांनी केले. संचालन महानाम रामटेके यांनी केले. येथील सभेच्या आयोजनाची जबाबदार युसुफ शेख गुरूजी यांनी सांभाळली.केळझर येथील बुद्ध विहारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ही पदयात्रा खडकीकडे रवाना झाली. खडकी येथे शुक्रवारी रात्री मुक्काम करून शनिवारी पदयात्रा सेलडोह मार्गे नागपूर जिल्ह्यात दाखल होणार आहे.साहेब कापूस वेचण्यासाठी बाई यायला तयार नाहीवर्धा - राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल पदयात्रा सेलू येथून केळझरकडे शुक्रवारी सकाळी रवाना झाली. यावेळी आ.धनंजय मुंडे, जयंत पाटील व खा. सुप्रिया सुळे यांनी शेतकºयाशी शेतात जावून संवाद साधला. गत वर्षीपेक्षा यावर्षी कापसाच्या उत्पादन ७५ टक्के फरक पडला आहे. एक बाई किमान १५ किलो कापूस वेचत होती. यंदा कापसाच्या बोंडचं सडून गेले आहे. त्यामुळे कापूस वेचासाठी महिला मजूर (बाई) शेतात यायला तयार नाही. एका एकरात १५ क्विंटल होत होता. यंदा तो होण्याची शक्यता नाही, असे सेलू परिसरातील शेतकºयाने नेत्यांना सांगितले. त्यानंतर पदयात्रा केळझरकडे रवाना झाली.