शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

सभास्थळी बैलबंडीतून पोहोचले नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:35 IST

यवतमाळ जिल्ह्यातून निघालेली हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे शुक्रवारी पोहोचली येथे दुपारी ३.३० वाजता बाजार चौकात जाहीर सभा झाली.

ठळक मुद्देहल्लाबोल यात्रा बुद्ध विहारात : भाजपच्या काळात सर्वाधिक आत्महत्या

आॅनलाईन लोकमतकेळझर : यवतमाळ जिल्ह्यातून निघालेली हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे शुक्रवारी पोहोचली येथे दुपारी ३.३० वाजता बाजार चौकात जाहीर सभा झाली. या सभेला हल्लाबोल पदयात्रेत सहभागी असलेले सर्व मान्यवर नेते बैलबंडीतून दाखल झाले. सभेनंतर बुद्धविहारात नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.सेलू येथून सकाळी पदयात्रेला प्रारंभ झाला दुपारी १ वाजता ही पदयात्रा केळझर येथे पोहोचली. पदयात्रेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. भास्कर जाधव, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आ. प्रकाश गजभिये, अनिल देशमुख, सुरेश देशमुख, चित्रा वाघ आदी नेते सहभागी होते. त्यानंतर स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. तेथे दुपारचे जेवण घेतल्यानंतर तेथून बैलबंडीच्या मिरवणूकीसह नेते सभास्थळी दाखल झाले. या सभेत बोलताना अजीत पवार यांनी केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारवर जोरदार टिका केली. शेतकºयाचा सातबारा कोरा झाला नाही. दररोज आत्महत्या वाढत आहे. आघाडी सरकारच्या काळात अनेक शेतकरी हिताचे निर्णय शरद पवार व आम्ही राज्यात घेतले, तसे सांगितले. या सभेला माजी आमदार सुरेश देशमुख, गुलाबराव गावंडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मिलिंद हिवलेकर यांनी केले. संचालन महानाम रामटेके यांनी केले. येथील सभेच्या आयोजनाची जबाबदार युसुफ शेख गुरूजी यांनी सांभाळली.केळझर येथील बुद्ध विहारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ही पदयात्रा खडकीकडे रवाना झाली. खडकी येथे शुक्रवारी रात्री मुक्काम करून शनिवारी पदयात्रा सेलडोह मार्गे नागपूर जिल्ह्यात दाखल होणार आहे.साहेब कापूस वेचण्यासाठी बाई यायला तयार नाहीवर्धा - राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल पदयात्रा सेलू येथून केळझरकडे शुक्रवारी सकाळी रवाना झाली. यावेळी आ.धनंजय मुंडे, जयंत पाटील व खा. सुप्रिया सुळे यांनी शेतकºयाशी शेतात जावून संवाद साधला. गत वर्षीपेक्षा यावर्षी कापसाच्या उत्पादन ७५ टक्के फरक पडला आहे. एक बाई किमान १५ किलो कापूस वेचत होती. यंदा कापसाच्या बोंडचं सडून गेले आहे. त्यामुळे कापूस वेचासाठी महिला मजूर (बाई) शेतात यायला तयार नाही. एका एकरात १५ क्विंटल होत होता. यंदा तो होण्याची शक्यता नाही, असे सेलू परिसरातील शेतकºयाने नेत्यांना सांगितले. त्यानंतर पदयात्रा केळझरकडे रवाना झाली.