शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

अडेल नेते; निरुत्साही कार्यकर्ते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:27 IST

काँग्रेसच्यावतीने राज्यात युवक काँग्रेसच्या निवडणूका घेण्यात येत आहे.जिल्ह्यातही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली असून तीन दिवस मतदार संघनिहाय हा रणसंग्राम चालणार आहे.

ठळक मुद्देतीन दिवस युवक काँग्रेसचा रणसंग्राम : आर्वीत उमेदवार मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसच्यावतीने राज्यात युवक काँग्रेसच्या निवडणूका घेण्यात येत आहे.जिल्ह्यातही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली असून तीन दिवस मतदार संघनिहाय हा रणसंग्राम चालणार आहे. परंतू निवडणुकीतील ओसरलेला उत्साह पाहून या निवडणुकीवरही सत्ता आणि नेत्यांचा अडेलपणाचा प्रभाव पडल्याची ओरड काही कार्यकर्त्यांकडून होत आहे.भाजपाच्या लाटेतही कॉग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात पक्षाचे वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले. आमदार रणजित कांबळे, आमदार अमर काळे व माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे हे काँग्रेसचे तीन नेते आहे. ज्येष्ठ नेता म्हणून आ. कांबळे यांच्याच खांद्यावर पक्षाची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. परंतु या तिनही नेत्यामध्ये काहीसी फारकत असल्याचे वारंवार पुढे आले आहे. आता युवक काँग्रेसच्या निवडणुकीतही पुन्हा मतभेद उघड झाले आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातून युवक काँग्रेसची सदस्य नोंदणी झाली, पण ती फारच अत्यल्पच आहे. त्यामुळे या मतदार संघात विधानसभा अध्यक्षपदासाठी एकही उमेदवार ठरविण्यात आला नाही. त्यामुळे आर्वी, आष्टी व कारंजा या तिनही तालुक्यात युवक काँग्रेस पर्यायाने काँग्रेसप्रती कार्यकर्त्यांमध्ये निरु त्साह तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकेकाळी युवक कॉग्रेसच्या निवडणुकीचा वेगळाच धडका असायचा पण, नेत्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे कार्यकर्तेही निरुत्साह झाल्याची चर्चा आहे.कांबळे व शेंडे गट आमने-सामनेजिल्ह्यात युवक कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाकरिता आमदार कांबळे गटाचे वीपीन राऊत तर शेंडे गटाचे गौरव देशमुख हे आमने-सामने उभे ठाकले आहे. या दोघांनाही आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा विधानसभेतील युवक काँग्रेसचे सदस्य मतदान करणार असून कुणाचे पारडे जड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आर्वीत कमी तर वर्ध्यात सर्वाधिक मतदारविधानसभा क्षेत्रानिहाय सदस्य नोंदणी करण्यात आली. त्यानंतर उमदेवार निश्चित करण्यात आले. यात सर्वात कमी ७० सदस्य नोंदणी ही आर्वी तालुक्यात झाली. तर सर्वाधिक सदस्य नोंदणी वर्धा विधानसभेत केली आहे. वर्ध्यात १ हजार १८९, देवळीत ८५० तर हिंगणघाटमध्ये १७७ सदस्यांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्व २ हजार २८६ मतदार जिल्हाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करतील. तर प्रत्येक विधानसभेतील मतदार हा विधानसभा अध्यक्षाला मतदान करणार आहे.आर्वी विधानसभेत अध्यक्षच नसणारजिल्ह्यातील युवक काँग्रेसचा वर्धा विधानसभा अध्यक्ष, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष, देवळी विधानसभा अध्यक्ष व आर्वी विधानसभा अध्यक्षासह जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्षपदाकरिता दोन उमेदवार रिंंगणात असून यातील एकाचा विजय निश्चित आहे. वर्धा विधानसभा अध्यक्षाकरिता विराज शिंदे व कुणाल भाकरे, हिंगणघाटकरिता नकूल भाईमारे व निखिल श्रीवास तर देवळी विधानसभाध्यक्षाकरिता निलेश ज्योत हा एकमेव उमेदवार असल्याने त्याची अविरोध निवड होईल.मात्र आर्वी विधानसभा क्षेत्रात एकही उमेदवार नाही. त्या मतदार संघात विद्यमान आमदार कॉग्रेसचे असतानाही मिळालेला नाही ही परिस्थिती पक्षासाठी चिंताजनक आहे.असे होणार मतदानयुवक कॉंग्रेसची निवडणूक प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धनपाल नेगी हे जिल्ह्यातील जबाबदारी सांभाळणार आहे. ९ सप्टेंबर रोजी देवळी विधानसभा, १० रोजी आर्वी व हिंगणघाट तर ११ सप्टेंबरला वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस