शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी

By admin | Updated: February 9, 2015 23:19 IST

दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासह जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे दिले.

वर्धा : दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासह जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रभा घंगारे यांच्या नेतृत्वात निवेदन पाठविण्यात आले. जिल्ह्यात १९७२ पासून दारूबंदी कायदा अमलात आला. मात्र हा कायदा आज कागदोपत्रीच उरला आहे. एकदाचे प्यायला पाणी मिळणार नाही; मात्र दारू कुठेही आणि केव्हाही सहज उपलब्ध होते. जिल्ह्यासह शहरातील बहुतांश भागात राजरोसपणे दारूचे व्यवसाय सुरू आहेत. जिल्ह्याच्या सीमालगत असलेल्या वाइन शॉप, बारमधून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने दारूसाठा येतो, हे सर्वश्रुत आहे. दारूबंदीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे. मात्र हा विभागही बघ्याची भूमिका घेऊन आहे. पोलीस विभागामार्फत दररोज कुठे ना कुठे धाडसत्र राबविले जाते, मात्र तीळमात्रही दारू हद्दपार झाली नाही. शहरातील बेरोजगार युवकांनी नोकऱ्याच मिळत नसल्याच्या कारणावरून दारूविक्री व्यवसाय थाटला आहे. अनेक रस्त्यांवर मद्यपी पडलेले असल्याचे चित्रही नित्याचे झाले आहे. दारूबंदीच्या कामात हातभार लावणाऱ्या महिलांवरच हल्ले होतात. त्यामुळे हे चित्र थांबविण्यासाठी कथोर कायदे करण्याची मागणी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. शिष्टमंडळात प्रभा घंगारे, संजय भगत, शबनम शेख, शारदा गजभिये, वंदना कातोरे, बेबी मन्ने यांच्यासह महिलांनी सहभाग नोंदविला.(शहर प्रतिनिधी)