शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

लालनाला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 6:00 AM

तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे.

ठळक मुद्देधरण वर्धा जिल्ह्यात; पाण्याचा लाभ चंद्रपूर जिल्ह्याला!

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यात लालनाला प्रकल्प आहे; मात्र मुसळधार पाऊस आल्यास धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नदीकाठावरील घरांना धोका होतो. शिवाय प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना लाभ मात्र, चंद्रपूरला होतो. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे. तसेच कोरा, उसेगाव, तळोदी, अकोला, गणेशपूर, कृष्णापेठ, पाताळकोट, साखरा, दसोडा, सिल्ली, मंगरूळ, गाठवदेव महारमजरा, गाडामोडी या गावांतील जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले.या गावातील शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन धरणाला अल्प मोबदल्यात दिली. धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण असताना अनेक सुशिक्षित बेरोजगार नोकरीपासून वंचित असून मजुरी करून हलाखीचे जीवन जगत आहे. प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना त्याचे पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न मिळता चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्राला दिले जात आहे. आतातर चक्क भूमिगत जलाहिनी टाकून चिमूर भागात पाणी पळविण्याचा प्रकार सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. मध्यंतरीच्या काळात माया ठवरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जाणारे पाणी अडविण्याकरिता आंदोलन केले. आंदोलन दडपण्यात आले. या धरणात पाण्याचा साठा २७६१३ दलघमी असून लांबी ३३१५ मीटर, उंची १४६१ लिटर आहे. सद्यस्थितीत धरण भरले असून थोडाही पाऊस आला तर धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नाल्याच्या दोन्ही काठावरच्या जमिनी खरडून वाहून जात असल्याने शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धरणग्रस्त अनेक बाबीने त्रस्त आहेत.शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का?लालनाला प्रकल्प समुद्रपूर तालुक्यात आहे. त्यामुळे येथील शेतीक्षेत्र सिंचनाखाली यायला हवे. मात्र, प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना दिला जात नसून चंद्रपूर जिल्ह्यात महाऔष्णिक केंद्राला दिले जाते. पाणी चिमूर भागात पळविण्याचेही कटकारस्थान सुरू असताना शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Damधरण