शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

लाखात, कोटीत घोषणा पण; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 3:28 PM

केंद्र सरकार लाखात, कोटीत घोषणा करतात मात्र, वास्तविकता फार वेगळी राहत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडले. अशा घोषणाबाजीतून चुकीचा संदेश दिल्यात जात असल्याचे मत, शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले असून सरकारच्या हमीभावार टीकाही केली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या धोरणाविषयी व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हंगामापूर्वी केंद्र शासनाने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केलेत. तेव्हा उत्पादन खर्चावर ५० ते ८० टक्के नफा देणारे भाव वाढवून दिल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकार लाखात, कोटीत घोषणा करतात मात्र, वास्तविकता फार वेगळी राहत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडले. अशा घोषणाबाजीतून चुकीचा संदेश दिल्यात जात असल्याचे मत, शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले असून सरकारच्या हमीभावार टीकाही केली आहे.केंद्र सरकारने नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे केवळ ३ ते १० टक्क्यापर्यंत हमीभाव वाढविले असताना शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर ५० ते ८० टक्के हमीभाव वाढविल्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी ५० टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, असे जाहीर केले पण, दिले नाही. स्वाभिमान आयोगाच्या शिफारशींची योग्य अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती भाव वाढलेत, हे सरकारने लक्षात घ्यावे, असा प्रश्नही जावंधिया यांनी उपस्थित केला आहे. कापसाचे भाव ५ हजार ५५० रुपयांवरुन ५ हजार ८२५ रुपये क्विंटल केले. तुरीचे भाव ५ हजार ८०० रुपयांवरुन ६ हजार रुपये क्विंटल केलेत. धान, तूर, हरभरा, मका यापैकी आजही शेतकºयांच्या कुठल्याच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. खरेदी केंद्र नसल्याने कमी भावात शेतमाल विकावा लागत आहे. जागतिक बाजारपेठेतील स्थितीनुसार कापसाला ४ हजार ५०० रुपयांच्यावर भाव देऊ शकत नाही. देशाची अर्थव्यवस्था अब्जावधीची करताना, शेतमालाचे हमीभाव दुप्पट होतील का? याचे उत्तर पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये द्यावे, असेही शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणाले.

व्यापाऱ्यांच्या खरेदीत शेतमालाला भावाचं संरक्षण द्याकेंद्र सरकारने यावर्षी ३ ते १० टक्क्यापर्यंत हमीभाव वाढवून निव्वळ धूळफेक केली आहे. शेतकऱ्यांना आत्मनिर्भय करण्यासाठी जगातून कोणताही शेतमाल हमी पेक्षा कमी भावात आयात होणार नाही. वायदे बाजार आणि गावांमध्ये व्यापाऱ्यांकडून थेट खरेदीतही भावाचे संरक्षण करण्याची घोषणा सरकारने करावी, अशी मागणीही जावंधिया यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी