शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

चाकूच्या धाकावर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 5:00 AM

मालवाहू चालक अनिल सुखदेव पाटील रा. सानेवाडी हा एम.एच.३२ क्यू. २०४६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून ४०० लिटर डिझेल, १० लिटर पेट्राेल घेऊन म्हसाळा नजीकच्या बायपास रस्त्याने जात असताना दरोडेखोरांनी कार आडवी लावून चाकूचा धाकावर त्याचे अपहरण करीत कारमध्ये बसवून कान्होलीबारा येथील जंगलात सोडून देत मालवाहू वाहन आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मालवाहू चालकाचे अपहरण करुन त्याला जंगलात सोडून चाकूचा धाक दाखवून वाहनासह डिझेल असा एकूण २ लाख ९५ हजार ४२० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला होता. याप्रकरणाचा संयुक्त तपास सेवाग्राम पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा करीत असतानाच पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत दरोडेखोरांचा शोध लावून तब्बल चौघांना बेड्या ठोकल्या तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सूरज सहदेव चव्हाण रा. आमगाव खडकी, सोमेश वसंत उईके रा. महाबळा, विकास ऊर्फ जितू नामदेव चामलाटे रा. पंजाब कॉलनी वर्धा, सागर अरविंद वाघाडे रा. गजानन नगर, वर्धा यांचा समावेश असून दोन अल्पवयीनांना ही ताब्यात घेतले आहे. मालवाहू चालक अनिल सुखदेव पाटील रा. सानेवाडी हा एम.एच.३२ क्यू. २०४६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून ४०० लिटर डिझेल, १० लिटर पेट्राेल घेऊन म्हसाळा नजीकच्या बायपास रस्त्याने जात असताना दरोडेखोरांनी कार आडवी लावून चाकूचा धाकावर त्याचे अपहरण करीत कारमध्ये बसवून कान्होलीबारा येथील जंगलात सोडून देत मालवाहू वाहन आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता. याचा समांतर तपास गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलीस करीत असतानाच त्यांना गुन्हा करताना एम.एच. ३१ ए. ई. ९५९९ क्रमांकाच्या कारचा वापर झाल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली आणि चार आरोपींना बेड्या ठोकून दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, निरंजन वरभे, गजानन लामसे, रणजित काकडे, यशवंत गोल्हर, राजेंद्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, अभिजीत वाघमारे, प्रदीप वाघ, गोपाल बावणकर, अमोल ढोबाळे यांनी केली.

६.७४ लाखांचा माल अमरावती जिल्ह्यातून ‘रिकव्हर’-    आरोपींना ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी सर्व मुद्देमाल अमरावती येथे विकल्याचे सांगितले. पोलीस पथक अमरावतीला रवाना झाले असता गुन्ह्यात वापरलेली कार, चार मोबाईल, तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपी दीपक सहदेव चव्हाण, सुनील पुंडलिक बारबुद्धे दोन्ही रा. गुरुकुंज मोझरी जि. अमरावती यांच्याकडून ४०० लिटर डिझेल जप्त करुन आर्वी सावळापूर शिवारात सोडलेला मालवाहू, बॅटरी असा एकूण ६ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना सेवाग्राम पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस