शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मोझरी परिसरातील मार्गांवर खड्डाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:03 PM

ग्रामीण भागाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता रस्त्यांचे जाळे विनण्यात आले. परंतु या रस्त्यांच्या देखभाल दुुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करणे जीवघेणे ठरत असल्याची ओरड नागरिक करीत आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघाताच्या प्रमाणात वाढ

मोझरी (शे.) : ग्रामीण भागाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता रस्त्यांचे जाळे विनण्यात आले. परंतु या रस्त्यांच्या देखभाल दुुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करणे जीवघेणे ठरत असल्याची ओरड नागरिक करीत आहे.मोझरी (शेकापूर) हे जिल्ह्याच्या टोकावरील गाव असून जिल्हा परिषदेचे सर्कल आहे. या परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी वारंवार केली जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आली नाही. कित्येक वर्षांपासून या रस्त्यावर खड्डे पडले असून आता रस्त्यांवरील गिट्टीही बाहेर आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात किंवा रस्त्यावर आलेल्या गिट्टीवरुन वाहने घसरुन अपघात होत आहे. आता पावसाचे दिवस असल्यानेपावसामुळे रस्त्यावरील खड्डयात पाणी साचले आहे. या पाणी साचलेल्या खड्डयांचा वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरील वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहे.मोझरी-कानगाव मार्गावरील ३ कि.मी.पर्यंतचा मार्ग खड्डेमय स्थितीत आहे. तर मोझरी-खानगाव-आंबोडा हा १० कि.मी. पैकी ४ कि.मीचा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. मोझरी-पोटी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आणि नाल्यावरील पुलांना भगदाड पडले आहे. मोझरी-कोसुर्ला-मनसावळी मार्गावरील गिट्टी पूर्णपणे उखडली आहे. तसेच पुलाची अवस्था बिकट झाली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस