शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

कॉटन मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:54 PM

गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करून कुठेही बोंडअळीचे पंतग तयार होवून त्याचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिनिंग प्रेसिंग मालक व व्यवस्थापकांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करून कुठेही बोंडअळीचे पंतग तयार होवून त्याचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.सोमवारी त्यांनी जिल्ह्यातील सर्र्व जिनिंग व प्रेसिंग मिलचे मालक, व्यवस्थापक यांची बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, पडलेल्या सरकीपासून झाडे उगवली असल्यास ती उपटून टाकून कोणत्याही ठिकाणी सरकीपासून झाड उगवू देऊ नका. पतंगाचा अटकाव करण्यासाठी प्रत्येकी दहा मिटर अंतरावर एक कामगंध सापळा याप्रमाणे सगळीकडे कामगंध सापळे लावावे. त्यामध्ये सापडणाºया पतंगाची गणना करून तालुका कृषी अधिकाºयांना कळवावे. ठिकठिकाणी प्रकाश सापळे संध्याकाळी ६ ते ११ च्या कालावधीत लावून जास्तीत जास्त पतंग किटक जमा होतील, अशी व्यवस्था करावी. या सर्व बाबींवर कार्यवाही न करणाºया मिलधारकांवर फौजदारी कलम १३३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच पर्यावरणास धोका निर्माण करणे याबाबींतर्गत पर्यावरण कायद्याच्या आधारे परवाना रद्द करण्याबाबत संबंधीत मंत्रालयास प्रस्ताव पाठविण्यात येईल. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले. सर्व मिलधारकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून त्यांच्या २ कि.मी परिसरातील शेतकºयांना किंवा एक हजार शेतकºयांना मोफत कामगंध सापळे व दोन ल्युर्स उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी त्यांच्या परिसरातील दोन हजार शेतकºयांना कामगंध सापळे व ल्युर्स उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या.हिंगणघाटात सर्वाधिक खरेदीबोंडअळीच्या प्रकोपानंतरही हिंगणघाट बाजार समितींतर्गत सर्वाधिक कापसाची खरेदी जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे हिंगणघाट, आर्वी, देवळी, वर्धा, सेलू येथील जिनिंग प्रेसिंग कंपनीसह जिल्ह्याच्या विविध भागातील मिल मालकांना जिल्हाधिकाºयांनी बैठकीतून प्रकोप वाढू नये यासाठी स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी व्यावसायिकांनीही बाजू मांडली.