शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते परत घेणे सरकारची जबाबदारी; भुपेश बघेल यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 13:44 IST

सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा निर्णय दिलेला असल्याचे मत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना व्यक्त केले.

वर्धा: गांधीजींचा आमच्या राज्याशी जवळचा संबंध राहिला आहे.ते दोनदा आले.आमचा परिवारही गांधी विनोबांच्या विचारांचा असून वडिल सर्वोदयी होते. गांधीजींच्या १५०व्या जयंती पर्वावर त्यांच्या विचारांप्रमाणे विविध योजना तयार करून राज्यात अमलात आणल्या आहे.यातून ग्रामस्वावंलबनातून विकास,रोजगार उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते परत घेणे सरकारची जबाबदारी आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा निर्णय दिलेला असल्याचे मत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना व्यक्त केले.

प्रसिद्ध महात्मा गांधीजींच्या आश्रमाला मुख्यमंत्री बघेल यांनी भेट दिली.त्यांच्या सोबत छत्तीसगढ कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम, उपाध्यक्ष गिरीश देवांगण,कोषाध्यक्ष रामगोपाल अग्रवाल,प्रदीप शर्मा इ.उपस्थित होते.ते नयी तालिम समिती परिसरात सुरू असलेल्या कांग्रेसच्या अहिंसाके रास्ते या सुरू असलेल्या शिबिरातील चर्चा सत्रात सहभागी होण्यासाठी ते आले होते. मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितले आमच्या परिवारात स्वातंत्र सैनिक असल्याने परिवार गांधी विनोबांच्या विचारांशी जुळलेला आहे.येवढेच नाही तर छत्तीसगढ जनतेशी जिवाळ्यांचे संबंध आहेत.महिलांच्या पुढाकाराने सरकारने जैविक शेतीसाठी पुढाकार घेतला असून यात सरकार शेतकऱ्यांकडून शेणखत विकत घेऊन गांडूळ खते बणवून त्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येत आहेत.यामुळे रासायनिक खतांपासून होणाऱ्या दुष्परिणामाल आळा बसेल.यातून गाव स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे सांगितले.

नक्षलवादी बाबत ते म्हणाले शांती,अहिंसेला विकल्प नाही.गांधीजींचा मार्ग आपल्या समोर आहे.हिंसेला लोकं कंटाळले आहेत.आम्ही विकासाकरीत जमिन देणे,तेंदूपत्त्याला अधिक भाव देणे,कोडूकुटका याला समर्थन यामुळे रोजगार उपलब्ध होत असल्याने  जनतेचा विश्र्वास आम्ही जिंकून घेतला.मागील सरकारपेक्षा दोनच वर्षांत वातावरण बदलले आहे. शेतकरी आंदोलनाला बाबत विचारले असता शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते मागे घेतले पाहिजे.देशातील मोठमोठे उद्योग सरकार विकत आहेत.आता लक्ष शेतकऱ्यांच्या जमिनीकडे लागले आहेत.हे सर्व पुंजीवाद्या़साठी होत असल्याची टिकाही बघेल यांनी केली.शेवटी कांग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असता अध्यक्ष सोनिया गांधी आहेत.पुढे पसंती मात्र राहुल गांधी यांना राहिल असे त्यांनी सांगितले.

आश्रमात आगमण होताच सूतमाळ आणि पुस्तक देऊन मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे स्वागत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांनी केले.तसेच सरपंच रोशना जामलेकर यांनी सुध्दा सर्वात केले.मार्गदर्शिका अश्विनी बघेल यांनी आदी निवास,बा कुटी,आखरी निवास,बापू कुटी,बापू दप्तर इ.ची माहिती तसेच इतिहास सांगितला.बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली.

गांधीजींनी लावलेल्या १९३६ मधील पिंपळ वृक्षाला पाणी घातले.बापू कुटी परिसरातील दानपेटीत ५ हजार रूपये टाकले. नोंदवहीत त्यांनी अभिप्राय लिहिला. आश्रमचे संचालक अविनाश काकडे,शोभा कवाडकर,कार्यालय मंत्री सिध्देश्वर उंबरकर,मार्गदर्शिका संगिता चव्हाण, दीपाली उंबरकर तसेच रूपाली उगले, नामदेव ढोले,आकाश लोखंडे,विजय धुमाळे, रामेश्वर गाखरे, सचिन हुडे,प्रशांत ताकसांडे इ.कार्यकर्ते उपस्थित होते‌. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, सेवाग्राम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे सुध्दा हजर होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार