शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते परत घेणे सरकारची जबाबदारी; भुपेश बघेल यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 13:44 IST

सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा निर्णय दिलेला असल्याचे मत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना व्यक्त केले.

वर्धा: गांधीजींचा आमच्या राज्याशी जवळचा संबंध राहिला आहे.ते दोनदा आले.आमचा परिवारही गांधी विनोबांच्या विचारांचा असून वडिल सर्वोदयी होते. गांधीजींच्या १५०व्या जयंती पर्वावर त्यांच्या विचारांप्रमाणे विविध योजना तयार करून राज्यात अमलात आणल्या आहे.यातून ग्रामस्वावंलबनातून विकास,रोजगार उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते परत घेणे सरकारची जबाबदारी आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा निर्णय दिलेला असल्याचे मत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना व्यक्त केले.

प्रसिद्ध महात्मा गांधीजींच्या आश्रमाला मुख्यमंत्री बघेल यांनी भेट दिली.त्यांच्या सोबत छत्तीसगढ कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम, उपाध्यक्ष गिरीश देवांगण,कोषाध्यक्ष रामगोपाल अग्रवाल,प्रदीप शर्मा इ.उपस्थित होते.ते नयी तालिम समिती परिसरात सुरू असलेल्या कांग्रेसच्या अहिंसाके रास्ते या सुरू असलेल्या शिबिरातील चर्चा सत्रात सहभागी होण्यासाठी ते आले होते. मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितले आमच्या परिवारात स्वातंत्र सैनिक असल्याने परिवार गांधी विनोबांच्या विचारांशी जुळलेला आहे.येवढेच नाही तर छत्तीसगढ जनतेशी जिवाळ्यांचे संबंध आहेत.महिलांच्या पुढाकाराने सरकारने जैविक शेतीसाठी पुढाकार घेतला असून यात सरकार शेतकऱ्यांकडून शेणखत विकत घेऊन गांडूळ खते बणवून त्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येत आहेत.यामुळे रासायनिक खतांपासून होणाऱ्या दुष्परिणामाल आळा बसेल.यातून गाव स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे सांगितले.

नक्षलवादी बाबत ते म्हणाले शांती,अहिंसेला विकल्प नाही.गांधीजींचा मार्ग आपल्या समोर आहे.हिंसेला लोकं कंटाळले आहेत.आम्ही विकासाकरीत जमिन देणे,तेंदूपत्त्याला अधिक भाव देणे,कोडूकुटका याला समर्थन यामुळे रोजगार उपलब्ध होत असल्याने  जनतेचा विश्र्वास आम्ही जिंकून घेतला.मागील सरकारपेक्षा दोनच वर्षांत वातावरण बदलले आहे. शेतकरी आंदोलनाला बाबत विचारले असता शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते मागे घेतले पाहिजे.देशातील मोठमोठे उद्योग सरकार विकत आहेत.आता लक्ष शेतकऱ्यांच्या जमिनीकडे लागले आहेत.हे सर्व पुंजीवाद्या़साठी होत असल्याची टिकाही बघेल यांनी केली.शेवटी कांग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असता अध्यक्ष सोनिया गांधी आहेत.पुढे पसंती मात्र राहुल गांधी यांना राहिल असे त्यांनी सांगितले.

आश्रमात आगमण होताच सूतमाळ आणि पुस्तक देऊन मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे स्वागत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांनी केले.तसेच सरपंच रोशना जामलेकर यांनी सुध्दा सर्वात केले.मार्गदर्शिका अश्विनी बघेल यांनी आदी निवास,बा कुटी,आखरी निवास,बापू कुटी,बापू दप्तर इ.ची माहिती तसेच इतिहास सांगितला.बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली.

गांधीजींनी लावलेल्या १९३६ मधील पिंपळ वृक्षाला पाणी घातले.बापू कुटी परिसरातील दानपेटीत ५ हजार रूपये टाकले. नोंदवहीत त्यांनी अभिप्राय लिहिला. आश्रमचे संचालक अविनाश काकडे,शोभा कवाडकर,कार्यालय मंत्री सिध्देश्वर उंबरकर,मार्गदर्शिका संगिता चव्हाण, दीपाली उंबरकर तसेच रूपाली उगले, नामदेव ढोले,आकाश लोखंडे,विजय धुमाळे, रामेश्वर गाखरे, सचिन हुडे,प्रशांत ताकसांडे इ.कार्यकर्ते उपस्थित होते‌. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, सेवाग्राम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे सुध्दा हजर होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार