शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

मुंबईतील भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

By रवींद्र चांदेकर | Updated: June 15, 2024 17:24 IST

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला आहे. त्यात भाजपचे दोन आकडी संख्येतही खासदार निवडून आले नाहीत.

वर्धा : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. शरद पवार गटाच्या नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. राज्यातील एकूणच पराभवावर ‘चिंतन’ करण्यासाठी मुंबईत भाजपने बैठकींचा सपाटा लावला आहे. या बैठकांमध्ये पराभव झालेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जात आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला आहे. त्यात भाजपचे दोन आकडी संख्येतही खासदार निवडून आले नाहीत. त्यामुळे भाजपने आता पराभवाचे ‘आत्मचिंतन’ सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात ९ जूनला राज्यातील भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पराभव स्वीकारण्यात आला. तसेच पुढील विधानसभा निवडणुकीसाठी नेमके काय करावे, आदी मुद्यांवर विचारमंथन करण्यात आले. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या राजीनाम्याला विरोध करून त्यांनीच उपमुख्यमंत्रिपदी कायम राहावे, असा ठराव पारित करण्यात आला. हा ठराव पक्षाला पाठविण्यात आला आहे.

आमदारांच्या बैठकीनंतर १४ जूनला मुंबईत पराभूत उमेदवार, भाजप जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. आपल्या उमेदवाराच्या पराभवाचे नेमके कारण काय? यावर चर्चा झाली. प्रथम या बैठकीत केंद्रात सत्ता स्थापन केल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर पराभवाची मिमांसा करण्यात आली. आपण का हरलो, हाच बैठकीचा प्रमुख मुद्दा होता. पराभवाची समीक्षा करून राहिलेल्या त्रुटी दूर करण्याचे आदेश देण्यात आले. पराभूत उमेदवारांनाही आपण कसे हरलो, याबाबत विचारणा करण्यात आली. कोणते मुद्दे पराभवाला कारणीभूत ठरले, याचा उहापोह करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले नाही, कोणी काम केले नाही, याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

प्रवीण दटके घेणार पराभवाचा आढावालोकसभेत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पक्षाने आता पराभवाची कारणे शोधण्यासाठी संबंधित लोकसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. वर्धा लोकसभेसाठी नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांची नियुक्ती केल्याची माहिती आहे. ते येत्या एक ते दोन दिवसात मतदारसंघात दाखल होऊन पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून पराभवाची कारणे जाणून घेणार आहेत.

पदाधिकाऱ्यांना बसणार झटकालोकसभेत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांना नजीकच्या काळात झटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे निरीक्षक आपल्या भेटीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवाराच्या विजयासाठी काम केले, कोणी काम केले नाही, यावर ‘फोकस’ ठेवणार असल्याचे सांगितले जाते. पदाधिकाऱ्यांच्या गावात ‘आपल्या’ आणि ‘विरोधी’ उमेदवाराला किती मते पडली, याचाही आढावा घेतला जाण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या गावातही पक्षाच्या उमेदवाराला किरकोळ मते पडल्याचे सांगितले जात आहे. अशा पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी तर होणार नाही ना? अशी चर्चा सुरू आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांची गोची होण्याची शक्यता आहे.

मुंबई येथे शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत पराभवाचा आढावा घेण्यात आला. पराभवाची कारणे शोधण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ते लवकरच मतदारसंघात दाखल होतील.- रामदास तडस, माजी खासदार तथा भाजप उमेदवार, वर्धा

टॅग्स :BJPभाजपाwardha-pcवर्धा