शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

मुंबईतील भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

By रवींद्र चांदेकर | Updated: June 15, 2024 17:24 IST

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला आहे. त्यात भाजपचे दोन आकडी संख्येतही खासदार निवडून आले नाहीत.

वर्धा : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. शरद पवार गटाच्या नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. राज्यातील एकूणच पराभवावर ‘चिंतन’ करण्यासाठी मुंबईत भाजपने बैठकींचा सपाटा लावला आहे. या बैठकांमध्ये पराभव झालेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जात आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला आहे. त्यात भाजपचे दोन आकडी संख्येतही खासदार निवडून आले नाहीत. त्यामुळे भाजपने आता पराभवाचे ‘आत्मचिंतन’ सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात ९ जूनला राज्यातील भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पराभव स्वीकारण्यात आला. तसेच पुढील विधानसभा निवडणुकीसाठी नेमके काय करावे, आदी मुद्यांवर विचारमंथन करण्यात आले. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या राजीनाम्याला विरोध करून त्यांनीच उपमुख्यमंत्रिपदी कायम राहावे, असा ठराव पारित करण्यात आला. हा ठराव पक्षाला पाठविण्यात आला आहे.

आमदारांच्या बैठकीनंतर १४ जूनला मुंबईत पराभूत उमेदवार, भाजप जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. आपल्या उमेदवाराच्या पराभवाचे नेमके कारण काय? यावर चर्चा झाली. प्रथम या बैठकीत केंद्रात सत्ता स्थापन केल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर पराभवाची मिमांसा करण्यात आली. आपण का हरलो, हाच बैठकीचा प्रमुख मुद्दा होता. पराभवाची समीक्षा करून राहिलेल्या त्रुटी दूर करण्याचे आदेश देण्यात आले. पराभूत उमेदवारांनाही आपण कसे हरलो, याबाबत विचारणा करण्यात आली. कोणते मुद्दे पराभवाला कारणीभूत ठरले, याचा उहापोह करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले नाही, कोणी काम केले नाही, याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

प्रवीण दटके घेणार पराभवाचा आढावालोकसभेत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पक्षाने आता पराभवाची कारणे शोधण्यासाठी संबंधित लोकसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. वर्धा लोकसभेसाठी नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांची नियुक्ती केल्याची माहिती आहे. ते येत्या एक ते दोन दिवसात मतदारसंघात दाखल होऊन पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून पराभवाची कारणे जाणून घेणार आहेत.

पदाधिकाऱ्यांना बसणार झटकालोकसभेत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांना नजीकच्या काळात झटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे निरीक्षक आपल्या भेटीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवाराच्या विजयासाठी काम केले, कोणी काम केले नाही, यावर ‘फोकस’ ठेवणार असल्याचे सांगितले जाते. पदाधिकाऱ्यांच्या गावात ‘आपल्या’ आणि ‘विरोधी’ उमेदवाराला किती मते पडली, याचाही आढावा घेतला जाण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या गावातही पक्षाच्या उमेदवाराला किरकोळ मते पडल्याचे सांगितले जात आहे. अशा पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी तर होणार नाही ना? अशी चर्चा सुरू आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांची गोची होण्याची शक्यता आहे.

मुंबई येथे शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत पराभवाचा आढावा घेण्यात आला. पराभवाची कारणे शोधण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ते लवकरच मतदारसंघात दाखल होतील.- रामदास तडस, माजी खासदार तथा भाजप उमेदवार, वर्धा

टॅग्स :BJPभाजपाwardha-pcवर्धा