शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

आदिवासींच्या विकास योजनांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: February 3, 2016 02:12 IST

जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या २.५० लाखांपेक्षा अधिक आहे. यात गोंड, परधान, कोलम, पारधी समाज अधिक संख्येने आहे.

मागणी : योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासकीय यंत्रणेची टाळाटाळवर्धा : जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या २.५० लाखांपेक्षा अधिक आहे. यात गोंड, परधान, कोलम, पारधी समाज अधिक संख्येने आहे. मात्र आदिवासी विकास यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील आदिवासी बांधव विकासापासून वंचित आहे. या योजनांना कार्यान्वित करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांना देण्यात आले. यावेळी प्रमुख मागण्यांतून समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. वर्धा जिल्ह्यात आदिवासी विभागामार्फत १४ आदिवासी आश्रमशाळा चालविण्यात येतात. जिल्ह्यात एकूण १२ वसतिगृह आहे. यातून ५ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शबरी महामंडळाच्या योजना व वैयक्तिक योजना कार्यरत आहे. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा त्वरीत तालुका पातळीवर स्थानांतरण करावे. आश्रमशाळा गावापासून जंगल परिसरात असल्याने त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तेथील कर्मचारी मुख्यालयी राहण्यास तयार नाही. दुर्गम भागात असलेल्या आश्रम शाळा त्वरीत तालुका पातळीवर स्थानांतरणाचा विचार व्हावा. तसेच पुलगाव, समुद्रपूर येथे मुला-मुलींचे वसतिगृह देण्यात यावे. जिल्ह्यातील आदिवासींना घरकूल योजनेचा लाभ मिळावा. गत तीन वर्षांत अनेक लाभार्थींनी अर्ज केले. मात्र अद्याप त्यांना घरकूल मिळालेले नाही. शेतकऱ्यांना स्वाभिमान योजनेअंतर्गत जमिनीचे वाटप केले नाही. या योजनेकरिता केलेली तरतुद वापस जात आहे, अशी माहिती आहे. याची दखल घ्यावी. जिल्ह्यात असलेल्या अनेक वसतीगृहात गैरसोयी आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जेवण योग्य दर्जाचे दिले जात नाही. साफ सफाईसाठी उपाययोजना नाही. सफाई कामगार गैरहजर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी आहे. आदिवासी बांबू कामगारांना अर्थ सहाय्य करावे. या मागण्यांबाबत नागपूर प्रकल्प अधिकारी यांना सूचना देण्यात याव्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष नामदेव मेश्राम, आर्वी तालुका अध्यक्ष सुरेश कोडापे, वर्धा शहर अध्यक्ष शरद आडे यासह पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)