शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

आदिवासींच्या विकास योजनांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: February 3, 2016 02:12 IST

जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या २.५० लाखांपेक्षा अधिक आहे. यात गोंड, परधान, कोलम, पारधी समाज अधिक संख्येने आहे.

मागणी : योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासकीय यंत्रणेची टाळाटाळवर्धा : जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या २.५० लाखांपेक्षा अधिक आहे. यात गोंड, परधान, कोलम, पारधी समाज अधिक संख्येने आहे. मात्र आदिवासी विकास यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील आदिवासी बांधव विकासापासून वंचित आहे. या योजनांना कार्यान्वित करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांना देण्यात आले. यावेळी प्रमुख मागण्यांतून समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. वर्धा जिल्ह्यात आदिवासी विभागामार्फत १४ आदिवासी आश्रमशाळा चालविण्यात येतात. जिल्ह्यात एकूण १२ वसतिगृह आहे. यातून ५ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शबरी महामंडळाच्या योजना व वैयक्तिक योजना कार्यरत आहे. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा त्वरीत तालुका पातळीवर स्थानांतरण करावे. आश्रमशाळा गावापासून जंगल परिसरात असल्याने त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तेथील कर्मचारी मुख्यालयी राहण्यास तयार नाही. दुर्गम भागात असलेल्या आश्रम शाळा त्वरीत तालुका पातळीवर स्थानांतरणाचा विचार व्हावा. तसेच पुलगाव, समुद्रपूर येथे मुला-मुलींचे वसतिगृह देण्यात यावे. जिल्ह्यातील आदिवासींना घरकूल योजनेचा लाभ मिळावा. गत तीन वर्षांत अनेक लाभार्थींनी अर्ज केले. मात्र अद्याप त्यांना घरकूल मिळालेले नाही. शेतकऱ्यांना स्वाभिमान योजनेअंतर्गत जमिनीचे वाटप केले नाही. या योजनेकरिता केलेली तरतुद वापस जात आहे, अशी माहिती आहे. याची दखल घ्यावी. जिल्ह्यात असलेल्या अनेक वसतीगृहात गैरसोयी आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जेवण योग्य दर्जाचे दिले जात नाही. साफ सफाईसाठी उपाययोजना नाही. सफाई कामगार गैरहजर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी आहे. आदिवासी बांबू कामगारांना अर्थ सहाय्य करावे. या मागण्यांबाबत नागपूर प्रकल्प अधिकारी यांना सूचना देण्यात याव्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष नामदेव मेश्राम, आर्वी तालुका अध्यक्ष सुरेश कोडापे, वर्धा शहर अध्यक्ष शरद आडे यासह पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)