शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

नोंदणी केलेली नसेल, तर तुमचा विवाह ठरेल बेकायदा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:59 IST

आठ महिन्यांत ३८९ विवाह नोंदणी : नोंदणी करणे आवश्यकच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विवाह नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. प्रत्येक धर्माच्या नागरिकाला ही नोंदणी अनिवार्य आहे. विवाहाची नोंदणी न केल्यास आपला विवाह बेकायदा ठरवला जातो. त्यामुळे विवाह नोंदणीकडे कल वाढत चालल्याचे स्पष्ट होते.

वर्धा नगरपालिकेत ऑनलाइन नोंदणी करून मागील आठ महिन्यांत ३८९ जोडप्यांनी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्याची माहिती आहे. लग्नानंतर महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घरगुती हिंसाचार, पतीच्या मृत्यूनंतर घराबाहेर काढणे, पतीच्या मालमत्तांमधून डावलणे आदी समस्या लक्षात घेऊन महिलांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी सरकारने विवाह नोंदणी अनिवार्य केली आहे. लग्नानंतर तीन महिन्यांच्या आत विवाह नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी वर्धा नगरपालिकेत स्वतंत्र कक्ष कार्यरत असून नोंदणीची संख्या वाढत आहे.

तोपर्यंत विवाह बेकायदाच... विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही. सध्या याबाबत जागरूकता करण्यात आली आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ नुसार वधू व वर हिंदू धर्माचे असतील, तर तो विवाह हिंदू मॅरेज अॅक्ट या कायद्यांतर्गत नोंद होतो. वधू व वर वेगवेगळ्या धर्माचे असतील, तर त्यांचा विवाह स्पेशल मॅरेज अॅक्ट या कायद्यांतर्गत नोंदणी केला जातो.

विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे • वधू-वराच्या आधारकार्डची सत्यप्रत. • लग्नाचे निमंत्रण देण्याची पत्रिका. • लग्नाच्या वेळचा दोघांचा फोटो, • नवरा-नवरी या दोघांचे वय प्रमाणपत्र. • पुरोहित, काझी यांचे आधार कार्ड. • आंतरजातीय विवाह असल्यास शंभर रुपयांच्या बाँडवर हमीपत्र. • पती-पती घटस्फोटीत असल्यास न्यायालयाचा आदेश. • विधूर असल्यास पहिल्या पती अथवा पत्नीचा मृत्यू दाखला. • वधू-वरांचे पासपोर्ट आकाराचे फोटो. • लग्नाच्या वेळी तीन साक्षीदारांची संपूर्ण माहिती व फोटो.

महिनानिहाय झालेली विवाह नोंदणी महिना                         नोंदणी जानेवारी                          ४३ फेब्रुवारी                          ५० मार्च                                १३ एप्रिल                              ०१ मे                                    ६९ जून                                  ४६ जुलै                                  ९८ ऑगस्ट                              ६९ 

"विवाहानंतर ९० दिवसांत नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते. जोपर्यंत विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह बेकायदेशीर ठरवला जातो. सध्या विवाह नोंदणी करण्याकडे जागरूकता दिसून येत आहे."- अभिजीत मोटघरे, विवाह नोंदणी अधिकारी न.प.

 

टॅग्स :wardha-pcवर्धा