शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

नोंदणी केलेली नसेल, तर तुमचा विवाह ठरेल बेकायदा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:59 IST

आठ महिन्यांत ३८९ विवाह नोंदणी : नोंदणी करणे आवश्यकच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विवाह नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. प्रत्येक धर्माच्या नागरिकाला ही नोंदणी अनिवार्य आहे. विवाहाची नोंदणी न केल्यास आपला विवाह बेकायदा ठरवला जातो. त्यामुळे विवाह नोंदणीकडे कल वाढत चालल्याचे स्पष्ट होते.

वर्धा नगरपालिकेत ऑनलाइन नोंदणी करून मागील आठ महिन्यांत ३८९ जोडप्यांनी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्याची माहिती आहे. लग्नानंतर महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घरगुती हिंसाचार, पतीच्या मृत्यूनंतर घराबाहेर काढणे, पतीच्या मालमत्तांमधून डावलणे आदी समस्या लक्षात घेऊन महिलांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी सरकारने विवाह नोंदणी अनिवार्य केली आहे. लग्नानंतर तीन महिन्यांच्या आत विवाह नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी वर्धा नगरपालिकेत स्वतंत्र कक्ष कार्यरत असून नोंदणीची संख्या वाढत आहे.

तोपर्यंत विवाह बेकायदाच... विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही. सध्या याबाबत जागरूकता करण्यात आली आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ नुसार वधू व वर हिंदू धर्माचे असतील, तर तो विवाह हिंदू मॅरेज अॅक्ट या कायद्यांतर्गत नोंद होतो. वधू व वर वेगवेगळ्या धर्माचे असतील, तर त्यांचा विवाह स्पेशल मॅरेज अॅक्ट या कायद्यांतर्गत नोंदणी केला जातो.

विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे • वधू-वराच्या आधारकार्डची सत्यप्रत. • लग्नाचे निमंत्रण देण्याची पत्रिका. • लग्नाच्या वेळचा दोघांचा फोटो, • नवरा-नवरी या दोघांचे वय प्रमाणपत्र. • पुरोहित, काझी यांचे आधार कार्ड. • आंतरजातीय विवाह असल्यास शंभर रुपयांच्या बाँडवर हमीपत्र. • पती-पती घटस्फोटीत असल्यास न्यायालयाचा आदेश. • विधूर असल्यास पहिल्या पती अथवा पत्नीचा मृत्यू दाखला. • वधू-वरांचे पासपोर्ट आकाराचे फोटो. • लग्नाच्या वेळी तीन साक्षीदारांची संपूर्ण माहिती व फोटो.

महिनानिहाय झालेली विवाह नोंदणी महिना                         नोंदणी जानेवारी                          ४३ फेब्रुवारी                          ५० मार्च                                १३ एप्रिल                              ०१ मे                                    ६९ जून                                  ४६ जुलै                                  ९८ ऑगस्ट                              ६९ 

"विवाहानंतर ९० दिवसांत नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते. जोपर्यंत विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह बेकायदेशीर ठरवला जातो. सध्या विवाह नोंदणी करण्याकडे जागरूकता दिसून येत आहे."- अभिजीत मोटघरे, विवाह नोंदणी अधिकारी न.प.

 

टॅग्स :wardha-pcवर्धा