झेडपीतील शंभरावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:20+5:30
जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तीन दिवस चालेल्या या नियोजनपूर्व बदली प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वित्त विभाग, लघु पाटबंधरे विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक), पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

झेडपीतील शंभरावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक बदल्यांची प्रक्रिया कोरानायनामुळे मे ऐवजी जुलै महिन्यात राबविण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या ऑफलाईन बदली प्रक्रियेमध्ये अकरा विभागातील तब्बल १०१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती व समानिकरण बदल्या करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तीन दिवस चालेल्या या नियोजनपूर्व बदली प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वित्त विभाग, लघु पाटबंधरे विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक), पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ सहायक (लिपिक), परिचर, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पट्टींबधक, विस्तार अधिकारी (कृषी), कृषी अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, औषधनिर्माण अधिकारी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, महिला व बालकल्याण सभापती सरस्वती मडावी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती मृणाल माटे, कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे, समाजकल्याण सभापती विजय आगलावे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत तीन दिवस ही बदली प्रक्रिया पार पडली. गुरुवारपासून सुरु झालेली ही प्रक्रिया रविवारपर्यंत चालली. शनिवारी सुटी आल्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशीही बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान कोरोना काळातील उपाययोजनांचे पालनही करण्यात आले.
समानिकरण बदल्याबाबत व्यक्त होताहेत नाराजी
जिल्हा परिषदेतील ११ विभागातील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती, आपसी व समानिकरण बदल्या करण्यात आल्या. यामध्ये १८ कर्मचाºयांच्या प्रशासकीय, १९ कर्मचाºयांच्या विनंती, १४ कर्मचाऱ्यांच्या आपसी तर ५० कर्मचाºयांच्या समानिकरण पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहे. सर्वाधिक बदल्या समानिकरण पद्धतीने करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांसह काही जिल्हा परिषद सदस्यांकडूनही याबाबत आक्षेप घेतला जात आहे. हा तोंडी आक्षेप लवकरच लेखी स्वरुपातही सभागृहात येण्याची शक्यता आहे.