शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:15 IST

यावर्षी पावसाच्या कमी पडण्यामुळे पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देकपाशीवर बोंडअळी : फवारणीही निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाच्या कमी पडण्यामुळे पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नियोजन गडबडल्यामुळे हिरव्याकंच दिसणाºया कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला आहे. शेतकºयांनी फवारणी करूनही अळी कमी झाली नाही. त्यामुळे ऐन हंगामात शेतकºयांसमोर संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाने औषध पुरविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.आष्टी, अंतोरा, लहानआर्वी, साहूर, भारसवाडा, तळेगावसह गावागावातील शेतकरी कृषी विभागाकडे घिरट्या घालत आहेत. कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रकाचा दौरा कृषी अधिकाºयांनी अद्यापही केला नाही. कपाशीवर गुलाबी बोंडअळी जास्त प्रमाणात दिसत आहे. कपाशीचे पीक पात्या फुलावर व बोंडावर आहे. त्यामुळे या अळीने पकड निर्माण केली आहे.आष्टी तालुक्यात फार कमी पाऊस पडला आहे. नदी नाल्यांना पाणी नाही. तलावात अवघा ३८ टक्के पाणीसाठी आहे. सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.आष्टी तालुक्यात १ हजार हेक्टर वर कपाशी पिकांना अळीने घेरले आहे. कृषी विभागाने गावागावात कृषी मार्गदर्शन मेळावे घेवून शेतकºयांवरील संकट कर करण्याची मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक वर्धा, कृषीमंत्री यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.निवेदनावर अनिकेत भडके नरसापूर, स्वप्नील महल्ले यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळाला नाही.कर्जाच्या संकटात बोंडअळीची भरबोंडामध्ये अळी शिरली की पूर्ण बोंड खराब होते. पाहिजे तसा कापूस त्यामधून निघत नाही. कापसाचा दर्जाही घसरतो. शिवाय सरकी किडक बनतात. रूईला मागणी करताना किंमत मिळत नाही. सरकीच्या तेलाचे प्रमाण फार कमी होते. याशिवाय निर्माण तयार होणाºया बियाण्याची उगवण क्षमता कमी झाल्याने उत्पन्नात फटका बसते. शेतकºयांना याची चिंता लागल्यामुळे यावर्षी उत्पन्न कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी आधीच कर्जापायी चिंतातूर आहे. त्यात नवीन संकट उभे ठाकले आहे.ममदापूर, आष्टी, मलकापूर तलावाची अवस्था पाण्यावाचून बिकट झाली आहे. अप्पर वर्धा धरणाचे एकही दार उघडले नाही. एवढी भीषण समस्या आहे.उपविभागीय कृषी अधिकारी पद गत दोन महिन्यांपासून रिक्त आहे. वरिष्ठ अधिकाºयांचा तालुक्यावर वचक दिसत नाही.