बहुरुपी समाजाला मिळणार घरकूल

By Admin | Updated: December 10, 2014 23:03 IST2014-12-10T23:03:14+5:302014-12-10T23:03:14+5:30

विदर्भात बहुसंख्येने असलेल्या बहुरूपी समाज आजही सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित आहे. जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने शैक्षणिक व सेवाक्षेत्रात आरक्षणाचा लाभ मिळत नसे.

Homeless people will get home | बहुरुपी समाजाला मिळणार घरकूल

बहुरुपी समाजाला मिळणार घरकूल

वर्धा : विदर्भात बहुसंख्येने असलेल्या बहुरूपी समाज आजही सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित आहे. जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने शैक्षणिक व सेवाक्षेत्रात आरक्षणाचा लाभ मिळत नसे. यामुळे सामाजिक विकासात माघारलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्य शासनाने बहुरूपी समाज बांधवांना घरकूल व जातीचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे.
यासंदर्भात नागपूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी माहिती दिली. वर्धा विधानसभा मतदार संघातील केळझर, जंगलापूर, सेलू, शिवनगर तसेच जिल्ह्यासह विदर्भात बहुरूपी समाज मोठ्या संख्येने आहे. मागील ५० वर्र्षांपासून हा समाज विशिष्ट भागात स्थायिक झाला नाही. भटक्या अवस्थेत राहिल्याने शासन दरबारी या समाजाची नोंद नव्हती. तब्बल ३० वर्षांनंतर या समाजातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला. यानंतरही शासकीय योजनांपासून हा समाज वंचित आहे. अद्यापही या समाजाला सरकारकडून कोणताच लाभ देण्यात आलेला नाही. प्रशासन व लोक प्रतिनिधींना वारंवार निवेदन देण्यात आले, पण यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. यामुळे हा समाज आजवर उपेक्षित राहिला. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास साध्य करता आला नाही.
यासंर्भात जिल्ह्यातील बहुरूपी समाजबांधवांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना निवेदन सादर केले. आ. डॉ. भोयर यांनी समाजाच्या समस्या लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशन दरम्यान बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री ना. दिलीप कांबळे, सामाजिक न्याय विभाग सहसचिव लोणारे, अपर सचिव लुबाळ, वर्धा समाज कल्याण उपायुक्त देशमुख, बहुरूपी समाजाचे ताराचंद माहुरे, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
या बैठकीत आ. भोयर यांनी समाजाच्या समस्या ना. कांबळे यांच्यासमोर मांडल्या. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. घरकूल नसल्यामुळे त्यांना उघड्यावर रहावे लागते. तसेच जातीचे प्रमाणपत्र नसल्याने शैक्षणिक व अन्य सुविधा मिळत नाही. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ना. कांबळे यांनी या समाजाला घरकुल देण्याची कार्यवाही करावी, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी संबंधित विभागाला निर्देश देण्यात येईल, असे आश्वासन सभेला उपस्थितांना दिले.
यावेळी बाबाराव तडस, गुंडू कावळे, निरंजन कदम, पवन जगताप, विष्णु माहुरे, ज्ञानेश्वर सुरतकर, हेमंत जगताप, भारत सुरतकार, संजय शिंदे, राजकन्या माहुरे, प्रभाकर शिंदे, बबन शिंदे, भारत माहुरे, पवन माहुरे यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Homeless people will get home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.