शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हिंगणघाट जळीत प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 03:20 IST

१५० पानांचे दोषारोपपत्र; विशेष सरकारी वकील निकम यांची नियुक्ती रखडली

महेश सायखेडे

वर्धा : हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. महिला तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्याकडून येत्या काही दिवसात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. हे दोषारोपपत्र सुमारे १५० पानांचे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. सुमारे आठ दिवस या प्रकरणातील पीडितेने मृत्यूशी झुंज दिली. त्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर या प्रकरणात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या गुन्ह्याची कलम वाढविण्यात आली आहे. हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला नागपूर येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे.अद्याप कोणताही पत्रव्यवहार नाही!हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचे आश्वासन राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले होते. मात्र अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना हा खटला चालविण्यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार शासनाने केला नसल्याची माहिती पुढे आहे. पीडित युवतीचे कुटूंबीय संतप्त झाले असून शासनाच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीडितेचा मृत्यु झाला त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित युवतीच्या वडीलांना प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल व विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक शासन करेल असे आश्वासन दिले होते.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस