दुसऱ्याला मदत करणे, हाच संस्काराचा मानबिंदू
By Admin | Updated: October 12, 2015 02:22 IST2015-10-12T02:22:42+5:302015-10-12T02:22:42+5:30
मानवी जीवन नश्वर असणे, ही त्याची प्राकृतिक अवस्था आहे. यामुळे जीवनाची प्रकृती, विकृती व संस्कृती समजून घेण्यासह निष्ठेने काम करणे ...

दुसऱ्याला मदत करणे, हाच संस्काराचा मानबिंदू
वेदप्रकाश मिश्रा : ‘जीवनाची सार्थकता’ विषयावर व्याख्यान
देवळी : मानवी जीवन नश्वर असणे, ही त्याची प्राकृतिक अवस्था आहे. यामुळे जीवनाची प्रकृती, विकृती व संस्कृती समजून घेण्यासह निष्ठेने काम करणे आदर्श व्यक्तिंच्या पावलांवर मार्गक्रमण करणे तसेच इतरांप्रती समर्पणाचा भाव असणे हिच जीवनाची सार्थकता आहे, असे विचार कृषी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, हिच संवेदनशिलता चिंतन व समानुभूती आहे. एकाग्रता, स्वार्थ, आत्मचिंतन हे सर्वांजवळ असते; पण सफलता व सिद्धता हे जीवनाच्या सार्थकतेचे कारण बनू शकत नाही, हेच वास्तव आहे. प्रतिष्ठा पणाला लावून निष्ठा जोपासणे हे प्रामाणिकतेचे कारण ठरले आहे; पण खोट्या प्रतिष्ठेसाठी समाजातील ढोंगी लोकांनी समाजसेवेचे सोंग उभे केले आहे. दोन हे कल्याणाचे प्रतिक असल्याने यात निष्ठा, संकल्प व उदात्तता असली पाहिजे. दाता बनण्यासाठी दान दिले जात आहे तर असे दानी व्यक्ती समाजातील ढोंगी व पापी असल्याचे उघड झाले. सामाजिक अनुबंधनासाठी राम बनणे गरजेचे आहे. केवळ अयोध्येपुरता रामाला मर्यादित न ठेवण्यामागे कैकयीची दूरदृष्टी समजून घेतली पाहिजे. सन्याश्याच्या पेहरावात जंगलातील काटेरी मार्गावर सीता व लक्ष्मणाच्या समोर अनवानी चालणे ही रामाची सार्थकता आहे. मुल्यांच्या आधारावर मार्गक्रमण करणे हेच जीवन आहे. इतरांसाठी जगणे हिच मानवी जीवनाची फलश्रूती आहे. अतुलनीयतेपेक्षा अनुकरणीय यात जीवनाची सार्थकता आहे, असेही डॉ. मिश्रा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)