शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

वर्धा जिल्ह्यात पावसाचे थैमान; नदी-नाल्यांना पूर, ४२ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 11:20 AM

अतिवृष्टीचा वर्धा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला असून पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देनिम्न वर्धा प्रकल्पाची ३१ दारे उघडलीएनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक दाखल

वर्धा : जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच आहे. रविवारी सायंकाळ पासूनसुरु असलेला संततधार पाऊस सोमवारी कायम असून अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आल्याने ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाटसह जिल्ह्यातील नदी काठावरील अनेक गावांना पुराचा वेढा असल्याने युद्धपातळीवर विशेष प्रयत्न करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी हिंगणघाट तालुक्यात एनडीआरएफची एक तर एसडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी वर्धा जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर बचाव कार्यासाठी एनडीआरएफ अन् एसडीआरएफची चमू वर्धा जिल्ह्यात दाखल झाल्या हे विशेष.

आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे आज १८ जुलै रोजी सकाळी ६.१५ वाजता १०० सेंमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान सुरु आहे. त्यामुळे सद्यस्थितीत प्रकल्पातून १६२५.१३ घन.मी/से. पाणी विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्राच्या दोनही काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

देवळी तालुक्यातील सोनोरा ढोक गावात २१ घरांमध्ये पाणी गेल्यामुळे त्यांना गावातील वरील भागातील घरांमधे हलवण्यात आले आहे सेलू तालुक्यातील चाणकी-कोपरा गावादरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे. हमदापूर येथे राष्ट्रीय महामार्गच्या कामामुळे काही घरांमधे पाणी घुसले आहे.

बाभूळगाव पुलावरून पाणी सुरू असल्याने रहदारी बंद झाली आहे. काही घरे पाण्याखाली गेली आहेत. हिगणघाट तालुक्यातील हिंगणघाट मंडळात रात्री २११ मीमी पाऊस झाल्याने महाकाली नगर मधील २० घरामध्ये भाकरा नाल्याचे पाणी घुसले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले आहे.

सेलू तालुक्यातील सिंदी ते दिग्रज येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने दिग्रज गावाचा वाहतूक संपर्क तुटलेला आहे. तसेच सिंदी ते पळसगाव बाई येथील वाहतूक संपर्क बंद झाला. तसेच दहेगाव ते पहेलानपुर वाहतूक संपर्क बंद झाला आहे. 

बोरखेडी कलालगत असलेल्या नाल्याला पूर आला असुन रोडवरून अंदाजे ३ ते ४ फूट पाणी आहे. ये जा बंद करण्यात आली आहे. पिंपळगाव येथे बोर नदीला पूर गावापर्यंत पाणी शिरले. तुर्त कोणताही धोका नाही. परंतु सर्वत्र पाउस होत असल्याने नदी व नाले तुडूंब भरुन वाहत आहे. चिंचोली लगत असलेल्या नाल्याला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक संपर्क बंद झाला आहे.

आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झालेली आहे. दोन्ही साईडला पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आर्वी शिरपूर रोड खडकीजवळ बंद झाला आहे. हिंगणघाट तालुक्यात कान्होली गावात पाणी शिरले आहे. कुटकी मार्ग, दाभा मार्ग, पिंपळगाव रोड बंद झाला आहे. सोनेगाव कान्होली आलमडोह या गावात पाणी शिरले आहे. 

बोर प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले

सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे नऊ दरवाजे सोमवारी दुपारी ४ वाजता ३० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे बोर नदीच्या पात्रात सध्या १३० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून बोर नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आर्वी - तळेगाव मार्ग झाला बंद, वाहतूक खोळंबली 

आर्वी तालुक्यात दहा तासापासून सतत सुरू असलेल्या पावसाने नदी नाल्याला पूर आला आहे. आर्वी तळेगाव या मार्गवरील वर्धामनेरी येथील नदीला पूर आल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. या मार्गावरील अमरावती, नागपूर, वरुड, मोर्शी आदी  बसेस बसस्थानकात अडकल्या आहेत. नदीचा पूर ओसरल्यावर त्या सोडण्यात येणार असल्याचे  एस.टी वाहतूक विभागाने स्पष्ट केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरwardha-acवर्धा