शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 13:36 IST

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्री सुनील केदार यांनी आढावा घेतला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून वर्धा तालुक्यातील गावांचा आढावा आमदारांनी ग्रा.पं.च्या कचरा विल्हेवाटासाठी जागा देण्याची केली मागणी

वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दरवर्षी टंचाई आराखडा तयार करून अशा गावांमध्ये प्राधान्याने पाणीपुरवठ्याची कामे प्रस्तावित करतो. ही कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासोबतच जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या प्रस्तावातील कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपवनसंरक्षक राकेश सेपट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजू कळमकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी या वेळी गावनिहाय पाणीटंचाई, जलजीवन मिशन, अतिक्रमण नियमानुकूल करणे, अंगणवाडी बांधकाम, वर्गखोल्या बांधकाम, उप आरोग्य केद्र बांधकाम, जनसुविधा व नागरी सुविधा, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामाची सद्यस्थिती, पाणंद रस्ते यांसह विविध विषयांचा आढावा घेतला.

टंचाईची कामे करताना गावांना उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा हा उद्देश असतो. परंतु उन्हाळा संपत असतानाही कामे पूर्ण होत नाही. असे होता कामा नये. मंजूर झालेल्या आराखड्याप्रमाणे कालमर्यादेत ही कामे करण्यात यावी. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामेसुध्दा प्राधान्याने आणि काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावी. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी निकषाप्रमाणे आपल्या गावातील पाण्याची नियमित जलतपासणी करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देणे, विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव, कृषिपंप जोडणी, स्मशानभूमी बांधकाम व दुरुस्ती, घरकुल आदींचाही पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. प्रत्येक गावातील सरपंच व सचिवांकडून त्यांनी गावातील समस्याची माहिती जाणून घेतली व या समस्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आमदार पंकज भोयर यांनी वर्धा शहरालगत असलेल्या १० ग्रामपंचायतीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा विषय मांडला. शहरालगतच्या गावांचे झपाट्याने शहरीकरण होत असल्याने वाढत्या शहरीकरणास वाढत्या सुविधा पुरविण्याकरिता या गावांचे नगर पंचायतीमध्ये रुपांतरण करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगितले. याबाबत पालकमंत्री महोदयांनी प्राधान्याने लक्ष घालावे, असेही आ. पंकज भोयर या वेळी म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकारwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातSunil Kedarसुनील केदारgram panchayatग्राम पंचायत