शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणीटंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 13:36 IST

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्री सुनील केदार यांनी आढावा घेतला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून वर्धा तालुक्यातील गावांचा आढावा आमदारांनी ग्रा.पं.च्या कचरा विल्हेवाटासाठी जागा देण्याची केली मागणी

वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दरवर्षी टंचाई आराखडा तयार करून अशा गावांमध्ये प्राधान्याने पाणीपुरवठ्याची कामे प्रस्तावित करतो. ही कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासोबतच जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या प्रस्तावातील कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपवनसंरक्षक राकेश सेपट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजू कळमकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी या वेळी गावनिहाय पाणीटंचाई, जलजीवन मिशन, अतिक्रमण नियमानुकूल करणे, अंगणवाडी बांधकाम, वर्गखोल्या बांधकाम, उप आरोग्य केद्र बांधकाम, जनसुविधा व नागरी सुविधा, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामाची सद्यस्थिती, पाणंद रस्ते यांसह विविध विषयांचा आढावा घेतला.

टंचाईची कामे करताना गावांना उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा हा उद्देश असतो. परंतु उन्हाळा संपत असतानाही कामे पूर्ण होत नाही. असे होता कामा नये. मंजूर झालेल्या आराखड्याप्रमाणे कालमर्यादेत ही कामे करण्यात यावी. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामेसुध्दा प्राधान्याने आणि काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावी. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी निकषाप्रमाणे आपल्या गावातील पाण्याची नियमित जलतपासणी करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देणे, विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव, कृषिपंप जोडणी, स्मशानभूमी बांधकाम व दुरुस्ती, घरकुल आदींचाही पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. प्रत्येक गावातील सरपंच व सचिवांकडून त्यांनी गावातील समस्याची माहिती जाणून घेतली व या समस्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आमदार पंकज भोयर यांनी वर्धा शहरालगत असलेल्या १० ग्रामपंचायतीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा विषय मांडला. शहरालगतच्या गावांचे झपाट्याने शहरीकरण होत असल्याने वाढत्या शहरीकरणास वाढत्या सुविधा पुरविण्याकरिता या गावांचे नगर पंचायतीमध्ये रुपांतरण करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगितले. याबाबत पालकमंत्री महोदयांनी प्राधान्याने लक्ष घालावे, असेही आ. पंकज भोयर या वेळी म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकारwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातSunil Kedarसुनील केदारgram panchayatग्राम पंचायत