शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 13:36 IST

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्री सुनील केदार यांनी आढावा घेतला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून वर्धा तालुक्यातील गावांचा आढावा आमदारांनी ग्रा.पं.च्या कचरा विल्हेवाटासाठी जागा देण्याची केली मागणी

वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दरवर्षी टंचाई आराखडा तयार करून अशा गावांमध्ये प्राधान्याने पाणीपुरवठ्याची कामे प्रस्तावित करतो. ही कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासोबतच जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या प्रस्तावातील कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपवनसंरक्षक राकेश सेपट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजू कळमकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी या वेळी गावनिहाय पाणीटंचाई, जलजीवन मिशन, अतिक्रमण नियमानुकूल करणे, अंगणवाडी बांधकाम, वर्गखोल्या बांधकाम, उप आरोग्य केद्र बांधकाम, जनसुविधा व नागरी सुविधा, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामाची सद्यस्थिती, पाणंद रस्ते यांसह विविध विषयांचा आढावा घेतला.

टंचाईची कामे करताना गावांना उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा हा उद्देश असतो. परंतु उन्हाळा संपत असतानाही कामे पूर्ण होत नाही. असे होता कामा नये. मंजूर झालेल्या आराखड्याप्रमाणे कालमर्यादेत ही कामे करण्यात यावी. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामेसुध्दा प्राधान्याने आणि काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावी. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी निकषाप्रमाणे आपल्या गावातील पाण्याची नियमित जलतपासणी करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देणे, विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव, कृषिपंप जोडणी, स्मशानभूमी बांधकाम व दुरुस्ती, घरकुल आदींचाही पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. प्रत्येक गावातील सरपंच व सचिवांकडून त्यांनी गावातील समस्याची माहिती जाणून घेतली व या समस्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आमदार पंकज भोयर यांनी वर्धा शहरालगत असलेल्या १० ग्रामपंचायतीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा विषय मांडला. शहरालगतच्या गावांचे झपाट्याने शहरीकरण होत असल्याने वाढत्या शहरीकरणास वाढत्या सुविधा पुरविण्याकरिता या गावांचे नगर पंचायतीमध्ये रुपांतरण करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगितले. याबाबत पालकमंत्री महोदयांनी प्राधान्याने लक्ष घालावे, असेही आ. पंकज भोयर या वेळी म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकारwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातSunil Kedarसुनील केदारgram panchayatग्राम पंचायत