संगणकीकृतऐवजी हस्तलिखित सात-बारा द्या
By Admin | Updated: May 1, 2015 01:44 IST2015-05-01T01:44:25+5:302015-05-01T01:44:25+5:30
शेतकऱ्यांना हस्तलिखित सात बारा मिळावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

संगणकीकृतऐवजी हस्तलिखित सात-बारा द्या
हिंगणघाट : शेतकऱ्यांना हस्तलिखित सात बारा मिळावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सध्या शेतकऱ्यांना सात बारा हा आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश निघाला असून एका दिवसात मिळणारा सातबारा यापुढे शेतकऱ्यांना तीन ते चार महिन्यानंतर मिळणार आहे.
निवेदन सादर करताना किसान अधिकार अभियानचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. तलाठ्याने संबंधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहितीची सीडी तयार करून ती आॅनलाईन पद्धतीने संगणकीकृत करून त्याद्वारे सात बारा देण्यात येणार आहे. हा आॅनलाईन पद्धतीने दुरूस्त झालेल्या खसरा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
शेतकरी पुढील महिन्यापासून नवीन हंगामाच्या तयारीला लागला आहे. नवीन हंगामात बँकेकडून कर्ज घ्यावे लागल्यास आॅनलाईन सात बारा शेतकऱ्यांना वेळीच मिळाला नाही तर कर्ज मिळण्यात अडचण येणार आहे. शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित सात बारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानने यावेळी निवेदनातून केली. यावेळी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)