कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST2020-03-04T05:00:00+5:302020-03-04T05:00:06+5:30

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा यासह उभ्या पिकांची नासाडी करणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या दोन प्रमुख मागणींसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी जंगली जनावरांच्या त्रासाने भयग्रस्त झाले आहेत

Give agricultural power to the farmers for 12 hours a day | कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज द्या

कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज द्या

ठळक मुद्देकिसान अधिकार अभियानचे धरणे आंदोलन : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा यासह उभ्या पिकांची नासाडी करणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या दोन प्रमुख मागणींसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी जंगली जनावरांच्या त्रासाने भयग्रस्त झाले आहेत. रोही, जंगली डुक्कर, निलगाय आदी वन्यप्राण्यांकडून शेतीतील उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. त्यामुळे वन्यजीव व मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी जंगलाला योग्य प्रकारे कुंपन करण्यात यावे. शेतात येणाऱ्या जंगली जनावरांना मारण्याची परवानगी शेतकरी बांधवांना देण्यात यावी. विद्युत पुरवठा दिवसाला राहत नसल्याने जीवाचा मोठा धोका पत्कारून रात्रीला शेतकऱ्यांना सिंचन करावे लागत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा या मागण्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. धरणे आंदोलनाचे नेतृत्त्व किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी केले. आंदोलनात विठ्ठल झाडे, गोपाल दुधाने, गजानन गिरडे, मंगेश शेंडे, प्रशांत बोरीकर, चंदू दुर्गे, किशोर हनवते, गणेश झाडे, इरफान अली, गजानन कडू, बालू सोनटक्के, प्रविण शेळके, भाऊराव काकडे, राजु बीडकर, गजानन पाल, अरूण राऊत, संजय दुधबडे, उमेश नरांजे, धनराज डगवार, वैभव वानी, गोविंद पेटकर, मोहन निमसडे, गोविंद केळापुरे, अनंता ठाकरे, प्रफुल्ल कुकडे यांच्यासह किसान अधिकार अभियानचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सूतकताईद्वारे नोंदविला निषेध
सरकार कुठलेही असो शेतकऱ्याच्या समस्या निकाली काढण्यासाठी ते पूर्णपणे यशस्वी झालेले नाही. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध म्हणून अविनाश काकडे यांनी चरख्यावर सूतकताई केली.

Web Title: Give agricultural power to the farmers for 12 hours a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.