शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

कचरा संकलनाच्या घंटागाड्या शोभेच्या

By admin | Published: July 17, 2017 2:11 AM

नगर पालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी कचरा व्यवस्थापन कार्यक्रम राबविला होता. यात कचरा संकलनासाठी वाहने खरेदी केली.

कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा : दीड-दोन महिन्यांपासून वाहने उभीचलोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : नगर पालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी कचरा व्यवस्थापन कार्यक्रम राबविला होता. यात कचरा संकलनासाठी वाहने खरेदी केली. काही वर्षे ही वाहने शहरातील वॉर्डात फिरून कचरा गोळा करीत होती; पण मागील काही महिन्यांत ती पालिकेची शोभा वाढवित आहेत. शहरात पाच वाहने असून चार वाहने पालिकेतच उभी आहेत. परिणामी, शहरात कचरा व्यवस्थापनाचा बोजवाराच उडाल्याचे चित्र आहे.शहरात कचऱ्याचे ढिगारे दिसू नये, नागरिकांना कचरा टाकण्यासाठी अन्यत्र जावे लागू नये म्हणून घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. सध्या पालिका प्रशासनाकडे पाच गाड्या आहेत; पण त्या कचरा संकलित करीत नाही. पाचपैकी चार वाहने पालिका कार्यालयाच्या आवारात उभ्या आहेत. तत्पूर्वी, तीन चाकी बंड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलित होत होता; पण त्या अस्थायी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. यामुळे त्या तीन चाकी कचरा संकलित करणाऱ्या गाड्या भंगारात गेल्या आहेत. यानंतर चार चाकी घंटागाड्या घेण्यात आल्या. काही दिवस या गाड्यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक वॉर्डातून कचरा गोळा करण्याचे काम करण्यात आले. यात ओला व सुका कचरा वेगळा गोळा केला जात होता. तो कचरा शहराबाहेर वर्धा रोडवरील ‘डम्पिंग ग्राऊंड’वर टाकला जात होता. या ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती प्रक्रियेसाठी तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी निवीदाही काढली होती; पण हा कार्यक्रम कागदावरच राहिला आहे. सध्या चारही गाड्या पालिकेच्या आवारात उभ्या आहेत. दीड ते दोन महिन्यांनी कधीतरी त्या शहरात फिरून कचरा गोळा करतात. यामुळे कचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा झाले असून लक्ष देणे गरजेचे झाले आहे.