शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

गांधी, विनोबांच्या गो-सेवा चळवळीला ७९ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:00 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबा भावे, जमनालाल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातून गो सेवा चळवळीची सुरूवात केली. महात्मा गांधी यांनी प्रथम वर्धा व जयपूर येथे अखिल भारतीय गो सेवा संघ सन १९३९ मध्ये स्थापन करून संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला.

ठळक मुद्देगोसेवा संघाची १९३९ मध्ये स्थापना : गोरस भंडारचा वटवृक्ष विस्तारला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधीविनोबा भावे, जमनालाल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातून गो सेवा चळवळीची सुरूवात केली. महात्मा गांधी यांनी प्रथम वर्धा व जयपूर येथे अखिल भारतीय गो सेवा संघ सन १९३९ मध्ये स्थापन करून संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला. या ऐतिहासीक घटनेला यंदा ७९ वर्षे पूर्ण झाले आहे. गांधीनी वर्ध्यांत सुरू केलेली ही चळवळ गोरस भंडारच्या रूपाने वटवृक्षात रूपांतरीत झाली आहे.१९३६ मध्ये या चळवळीला गांधीनी सुरूवात केल्यानंतर संपूर्ण जबाबदारी जमनालाल बजाज यांच्यावर सोपविली. जमनालालजींनी साथीक व्यवस्थापक म्हणून देशपांडे यांना संस्थेचे कामकाज पाहण्याची संधी दिली. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या पुढाकाराने या संस्थेचे रूपांतर सहकारात करून सन १९६१ मध्ये वर्धा तहसील गो. दुध उत्पादक सह. संघ गोरस भंडार या संघाची स्थापना केली.ही संस्था दुध उत्पादन व विक्री सेवा ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे काम करू लागली. शुद्ध दुधाचा ताजा पुरवठा व दुधापासून तयार केलेले उत्पादीत पदार्थ पेढा, बासुंदी, श्रीखंड, पनीर, गोरसपाक, ब्रेड आदी पुरवठा करण्यात येते आहे. गोरस भंडार या संघाची स्थापना करून संघाचे पहिले अध्यक्ष अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांना मान दिला. व संघाच्या कामाजास प्रत्यक्षात सुरूवात करून वर्धा तालुक्यामध्ये साटोडा, आंजी, बरबडी, सालोड, सज्जनवाडी, आलोडी या गावात संस्था स्थापन करून कामकाजात प्रारंभ केला. ‘इवलंस बीज त्याचा वेलू गेला गगणावरी’ या उक्ती नुसार महात्माजींनी सुरू केलेल्या या चळवळी चे (संघाचे) काम आज वर्धा तालुक्यातील नागपूर, बरबडी, सालोड, पिपरी, सेलुकाटे, आलोडी, श्रिसगाव, आजगाव, महाकाळ, पांढरकवडा, नांदोरा, नागठाणा, येरणगाव, आष्टा, साटोडा या गावापर्यंत पोहचले.या गावात संस्था स्थापन करून एक हजार दुध उत्पादकांकडून दैनिक तब्बल १३ हजार लिटर दुध संकलित करण्यात येते. या संघाला कोणतेही शासकीय अनुदान न मिळता संस्थेचे संपूर्ण कार्य स्वबळावर ‘ना नफा ना तोटा’ या पद्धतीवर चालविले जाते. गोरस भंडारचे वर्धा शहरामध्ये १२ अधिकृत केंद्र असून त्या केंद्रामधूनच दूध व दुग्धजन्य पदार्थ लोकांपर्यंत पोहचविले जातात. संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आजवर अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, भैय्यासाहेब मशानकर, दादाजी कासटवार, विठोबा शेंडे, वसंत पाटील, देवराव कासटवार यांनी सांभाळली. १०० कर्मचारी या संघात काम करीत आहे.संघामध्ये नवीन स्वयंचलित यंत्राची भर पडल्यामुळे कर्मचाऱ्याच्या कामाचा काहीसा ताण कमी होवून त्यामुळे दूधजन्य पदार्थ जास्तीत जास्त उत्पादीत होवून ग्राहकाची मागणी पूर्ण करता येईल.- माधवराव कडू, व्यवस्थापक, गोरस भंडार, वर्धानवीन यंत्रसामग्री दाखलसध्या दूध उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादन वाढविण्याकरिता संघामध्ये या वर्षी नवीन स्वयंचलीत यंत्र खरेदी केले होते. त्यात पेढा मशीन, आटा मिश्रण मशीन, बटर चर्णर आदी मशीन संस्थेने खरेदी केल्या आहेत. त्यामुळे पेढा, लोणी, गोरसपाक, श्रीखंड या पदार्थाच्या गुणवत्ता वाढणार आहे.वर्धा शहरातील ग्राहकाची संख्या लक्षात घेता संपूर्ण शहरामध्ये गोरस भंडारचे शुद्ध व दुध व ताजे दुधजन्य पदार्थ पोहचेल यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- देवराव कासटवार, अध्यक्ष, गोरस भंडार, वर्धा

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीVinoba Bhaveविनोबा भावे