शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शासकीय गोदामातील रेशनच्या धान्याला फुटले पाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 4:22 PM

वर्ध्यातील विकासभवनामागे असलेल्या शासकीय धान्य गोदामातून वितरित करण्यात येणार धान्यसाठ्याच्या पोत्यात ४ ते ५ किलो धान्य कमी असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे गोदाम व्यवस्थापकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकाळ्या बाजारात विक्रीचा संशय : स्वस्त धान्य दुकानमालकांचा आरोप

वर्धा : शासनाकडून गोरगरिबांसाठी स्वस्त दरात धान्य दिले जाते. मात्र, स्वस्त धान्य गोदामातून पुरवठा होणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाणाऱ्या धान्यसाठ्याच्या कट्ट्यात चार ते पाच किलो धान्य कमी मिळत असल्याचा आरोप आता स्वस्त धान्य दुकानदारांकडून केला जात आहे. त्यामुळे शासकीय गोदामील रेशनच्या धान्याला पाय फुटले की काय, असा प्रश्न सहज उपस्थित होतो आहे.

वर्धा तालुक्यात एकूण १४४ स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, वर्ध्यातील विकासभवनामागे असलेल्या शासकीय धान्य गोदामातून वितरित करण्यात येणार धान्यसाठ्याच्या पोत्यात चार ते पाच किलो धान्य कमी असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे गोदाम व्यवस्थापकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची नितांत गरज असल्याची मागणी आता स्वस्त धान्य दुकानमालकांकडून केली जात आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांनी अनेकदा जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारीही केल्या आहेत. त्यामुळे गरिबांच्या हक्काच्या धान्याचा काळ्या बाजारात विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत तत्काळ चौकशीचे आदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे.

काळ्या बाजाराचा गोरखधंदा

शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाणारा गहू, तांदूळ आदी धान्यसाठ्यात कमालीची तफावत असल्याचे अनेक दुकानचालकांनी सांगितले. ५० किलोचे एक पोते दुकानात येत असून दुकानचालकाने ते पोते मोजले असता त्यात तीन ते चार किलो धान्यसाठा कमी राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका पोत्यात ३ ते ४ किलो कमी धान्य राहत असून अशा किती पोत्यांतील धान्य गोदामात साठवणूक करून ठेवल्या जाते, हा प्रश्न आहे. त्यामुळे या धान्याची काळ्या बाजारात विक्री तर होत नसेल ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या कक्षात ई-पीक ॲपबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. बैठकीत एका स्वस्त धान्य दुकानचालकाने तहसीलदारांना गोदामातून धान्य कमी येत असल्याचे सांगितले. दरम्यान, तहसीलदारांनी थेट त्या दुकानचालकाच्या दुकानात जात पाहणी केली असता त्यांनाही ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ शासकीय गोदामात जात तपासणी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र, पुढे काय झाले, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

पुलगावातही असेच प्रकरण...

काही महिन्यांपूर्वी पुलगाव येथे रेशनचा धान्यसाठा भरून असलेला ट्रक पुलगाव पोलिसांनी पकडला होता. यावेळी पोलिसांना तेथील शासकीय गोदाम चालकावर संशय आल्याने त्याची चौकशी झाली. मात्र, त्यानंतर त्या प्रकरणात नेमका काय तपास झाला, हे गुलदस्त्यात आहे. वर्धा तालुक्यातही असाच प्रकार पुढे आला असून याची चौकशी करण्याची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिकfoodअन्न