शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या माजी पंचायत समिती सदस्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 13:46 IST

आजनादेवी गावात हळहळ

कारंजा (घाडगे) : शेती हा व्यवसाय सोबतच शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता. हळूहळू गावाच्या राजकारणात आल्याने सरपंचपद मिळाले होते. विकासाचा ध्यास अंगी बाळगून समाजकार्यात वाहून घेतलेल्या या व्यक्तीने पंचायत समितीचे सदस्यपदही पदरी पाडले होते. समाजकारण, राजकारण आणि आपला परंपरागत शेती व्यवसाय सांभाळत असताना सततच्या नापिकीचा सामनाही करावा लागला. परिणामी आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शिवसेनेच्या माजी पंचायत समिती सदस्याने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

विष्णू तेजराव खवशी (वय ४९, रा. आजनादेवी) असे या शेतकरी तथा माजी पंचायत समिती सदस्याचे नाव आहे. त्यांच्याकडे २५ एकर शेती असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, म्हातारे आई-वडील आहेत. सध्या मुलगी सनदी लेखापालच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. विष्णू खवरी हे सरपंच आणि पंचायत समिती सदस्यही राहिले आहेत. त्यांनी गावाच्या विकासाकरिता विविध योजना राबविल्यात.

दोन वर्षांपूर्वी भारतीय स्टेट बँक, शाखा कारंजाचे त्यांच्याकडे ३२ लाखांचे कर्ज होते. त्यांनी ९ लाख रुपये भरुन तडजोड केली होती. त्यानंतर पुन्हा त्याच बँकेने त्यांना २०२२ मध्ये ५ लाखांचे कर्ज दिले. मुला-मुलीचे शिक्षण, शेतीसाठी खर्च आणि परिवाराचा उदरनिर्वाह यावर होणारा खर्च यामुळे ते सतत आर्थिक विवंचनेत असायचे. त्यांनी बँकेत कर्जाची तडजोड करण्याकरिता ९ लाखांचे कर्ज खासगी सावकाराकडून घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच सततच्या नापिकीमुळे दोन वर्षांपासून शेतामध्ये लागलेला खर्चही भरून निघाला नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. यातून त्यांनी घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या या आकस्मिक निधनाने गावात शोककळा पसरली.

निष्ठावान शिवसैनिक हरपला

कारंजा तालुक्यात एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी गावाच्या, आता आपल्या परिसराच्या विकासासाठी मोलाचे कार्य केले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत असायचे. राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम असो की महावितरण कार्यालयावर बैलबंडी मोर्चा असो, यात ते सहभागी असायचे. विष्णू यांच्या मृत्यूमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. त्यांची जागा कधीही भरुन निघणारी नाही.

- संदीप भिसे, माजी तालुका संघटक, शिवसेना, कारंजा

टॅग्स :Deathमृत्यूwardha-acवर्धाShiv Senaशिवसेना